Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचे नाव घेऊ शकत नाही; अर्थमंत्री सीतारामन विरोधकांवर भडकल्या!

मंगळवारी (ता.२३) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पामध्ये काही राज्यांना डावलण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी आज केला. तसेच त्यांनी सभात्याग केला. याबाबत राज्यसभेत बोलताना सीतारामन यांनी अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचे नाव घेऊ शकत नाही. असे म्हटले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 24, 2024 | 03:45 PM
अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचे नाव घेऊ शकत नाही; अर्थमंत्री सीतारामन विरोधकांवर भडकल्या!

अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचे नाव घेऊ शकत नाही; अर्थमंत्री सीतारामन विरोधकांवर भडकल्या!

Follow Us
Close
Follow Us:

अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर विरोधकांनी काही राज्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तर सीतारामन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि कोणत्याही राज्याकडे दुर्लक्ष केले नसल्याचे सांगितले आहे.

दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने समजून घ्यावे

विरोधकांच्या आरोपांवर टीका करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, “काँग्रेस दीर्घकाळ सत्तेत राहिली आणि या काळात त्यांनी अनेक अर्थसंकल्प सादर केले. त्यांना माहीत आहे की, अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान प्रत्येक राज्याचे नाव घेणे शक्य नाही. अर्थसंकल्प मी महाराष्ट्राचे नाव घेतले नाही, केवळ उदाहरण म्हणून सांगितले गेले. पण तेथील एका प्रोजेक्टसाठी 76 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे, तर या राज्याकडे दुर्लक्ष झाले आहे, असे मानले जाईल का? असा सवालही सीतारामन यांनी केला आहे.

बजेट सादर झाले! अन् मुकेश अंबानींना बसला 9,206 कोटींचा फटका! वाचा नेमके कारण…

सीतारामन यांनी विरोधकांना सुनावले

अर्थसंकल्पीय भाषणात कोणत्याही राज्याचे नाव घेतले नसेल तर याचा अर्थ या राज्यांना काहीही मिळाले नाही असे होत नाही. अशा शब्दांमध्ये सीतारामन यांनी विरोधकांना सुनावले. यानंतरही सरकारने सादर केलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने अनेक राज्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला.

काय म्हटलंय सीतारामन यांनी?

विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर राज्यसभेत संबोधित करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे त्यांचे मत मांडण्यासाठी उभे राहिले. परंतु, माझे मत ऐकण्यासाठी ते थांबले नाहीत. लोकशाहीच्या सन्मानार्थ तरी त्यांनी इथे थांबायला हवे होते. या देशात काँग्रेस पक्ष बराच काळ सत्तेत आहे. त्यांनी खूप वेगवेगळे अर्थसंकल्प सादर केले आहेत. त्यामुळे त्यांनाही कळले पाहिजे की प्रत्येक अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचे नाव घेता येणे शक्य नाही,” असे स्पष्टीकरण देत निर्मला सीतारमण यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Web Title: Not every state can be named in the budget finance minister sitharaman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 03:42 PM

Topics:  

  • Budget
  • Budget 2024
  • maharashtra
  • Viksit Bharat
  • Viksit Bharat Budget 2024

संबंधित बातम्या

अन्वेषणाचा नवा युग! महाराष्ट्र साहसी पर्यटन आराखड्याचे विश्लेषण; बंजी जंपिंगसारख्या खेळांना मोठी मागणी
1

अन्वेषणाचा नवा युग! महाराष्ट्र साहसी पर्यटन आराखड्याचे विश्लेषण; बंजी जंपिंगसारख्या खेळांना मोठी मागणी

National Green Tribunal कडून माथेरान प्रदूषण प्रकरणी नोटीस; घोड्यांच्या लिदीवर उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत
2

National Green Tribunal कडून माथेरान प्रदूषण प्रकरणी नोटीस; घोड्यांच्या लिदीवर उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत

Cabinet Meeting : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मंजूर…; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
3

Cabinet Meeting : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मंजूर…; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Maharashtra Unseasonal Rain: शेतकरी हवालदिल! अवकाळीमुळे ५५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान, ३० हजारांहून अधिक बाधित
4

Maharashtra Unseasonal Rain: शेतकरी हवालदिल! अवकाळीमुळे ५५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान, ३० हजारांहून अधिक बाधित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.