
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
वर्ष २०२३-२४ मध्ये राइट-ऑफ केलेल्या बैंड लोनमधून एकूण वसुली केवळ ४६,०३६ कोटी झाली, यात २०१४-१५ ते २०२२-२३ दरम्यान झालेली २.०४ लाख कोटीची वसुली जोडली, तर ती एकूण २.५० लाख कोटी होते. याचा अर्थ असा की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात बँकांमधून एकूण १३.७६ लाख कोटी रुपये बाहेर काढण्यात आले.
| कॉर्पोरेट कर्जदार | दावा | वसुली | माफी |
|---|---|---|---|
| एरसेल लि. | ३६,१०२ | ६,६०० | ८२% |
| लॅन्को थर्मल पॉवर लि. | ३३.३३५ | १३६ | १००% |
| रिलायन्स कॅपिटल लि. | २६,०८९ | ९,६६१ | ६३% |
| जेट एअरवेज | १५,४३२ | १,१३३ | ९३% |
| रिलायन्स नेव्हल अॅड इंजि. | १२.८८४ | २.०४३ | ८४% |
| एस्सार पाँवर एमपी लि. | १२,७२४ | २,५०० | ८०% |
| रुची सोया | १२.१४६ | ४,२२३ | ६५% |
| लवासा कॉर्पोरेशन | ६,६४२ | १.६०४ | ७६% |
| उडीसा मॅगनीज अँड मिनरल्स | ५,४१४ | ३१८ | ९४% |
| जिऑन स्टील | ५.३६८ | १५ | १००% |
सुभाष चंद्रा यांना कथितपणे कर्जमाफीचा लाभदिल्यावरून सुरू असलेला विवाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळत म्हटले की, अशा प्रकारे उद्योगपतींचे मोठे कर्ज माफ करण्याचा मुद्दा येत्या दिवसांत अत्यंत गंभीर रूप धारण करू शकतो. त्यांनी आपल्या ‘एक्स ‘वर म्हटले की, एनसीएलटीची संपूर्ण कार्यपद्धती आणि कर्जदार कंपन्यांना दिली जात असलेली हेयर कट’ म्हणजे कर्जमाफी हा एक भयानक मुद्दा आहे.