(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
या बैठकीत व्यापार आणि गुंतवणुकीची मोठी क्षमता असलेल्या अनेक सेक्टर्सना निवडण्यात आलं आहे. ज्यामुळे भारताच्या औषधनिर्माण उद्योगाला लक्षणीय फायदा होईल. भारताने ब्राझीलमध्ये भारतीय औषधांची उपलब्धता आणि सोप्या नियामक प्रक्रियांची मागणी केली आहे. दोन्ही देशांनी औषधनिर्माण क्षेत्रातील व्यापार वाढवण्यावर विशेष भर दिला आहे.
भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे भारताच्या कृषी व्यापाराच्या क्षेत्राला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि अन्न उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यावरही चर्चा झाली. ब्राझील कृषी उत्पादनांसाठी एक प्रमुख बाजारपेठ बनू शकते, तर भारत ब्राझीलच्या कृषी उत्पादनांची आयात वाढवू शकतो. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार अधिक विस्तृत होऊ शकतो.
व्यापार विस्तारासाठी केमिकल सेक्टरला एक प्रमुख क्षेत्र म्हणून पाहिलं जात आहे. दोन्ही देश या क्षेत्रात निर्यात आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. इंजीनियरिंग वस्तू, केमिकल आणि मशीनरी उपकरणांमधील व्यापार वाढवण्यावरही एकमत झाले आहे. हे क्षेत्र दोन्ही देशांमधील औद्योगिक विकासाला नवी चालना देऊ शकते.
दोन्ही देशांनी दुर्मिळ मृदा आणि महत्त्वपूर्ण खनिजांमध्ये सहकार्य वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. यामुळे भारताला चीनवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होऊ शकते. दोन्ही देश AI, डिजिटल तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठीही प्रयत्न करत आहेत.
वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल आणि ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी यावर जोर दिला की, दोन्ही देश केवळ व्यापार वाढवण्यावरच लक्ष केंद्रित करणार नाहीत, तर दीर्घकालीन गुंतवणूक, बाजारपेठ उपलब्धता आणि औद्योगिक सहकार्य देखील मजबूत करतील. “दोन्ही देशांसाठी संतुलित आणि शाश्वत असे आर्थिक संबंध निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.






