(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
या सामंजस्य करारावर (MoU) AM/NS इंडियाचे संशोधन आणि विकास प्रमुख डॉ. विश्वनाथन एन. आणि ICAR-IARI चे सहसंचालक (संशोधन) डॉ. सी. विश्वनाथन यांनी स्वाक्षरी करून अदलाबदल केली, याप्रसंगी ICAR-IARI चे प्रमुख शास्त्रज्ञ आणि मुख्य संशोधक डॉ. भूपिंदर सिंग आणि दोन्ही संस्थांचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हे सहकार्य 2024 मध्ये AM/NS इंडिया आणि ICAR-IARI यांच्यात शेतीमध्ये लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांच्या योग्यतेचा शोध घेण्यासाठी सुरू झालेल्या उत्साहवर्धक प्राथमिक अभ्यासावर आधारित आहे, कारण लोह खनिजाच्या शुद्धीकरणादरम्यान तयार होणाऱ्या या लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांमध्ये सिलिका, आयर्न ऑक्साईड, ॲल्युमिना, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी नैसर्गिक खनिजे आणि इतर सूक्ष्म व उपयुक्त पोषक तत्त्वे आढळली होती, ज्यांचा वापर पिकांच्या उत्पादनासाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो.
ICAR-IARI, नवी दिल्ली आणि AM/NS इंडियाच्या किरंदुल, छत्तीसगड येथील शुद्धीकरण केंद्राजवळ घेतलेल्या प्राथमिक प्रयोगशाळा आणि शेतातील अभ्यासातून आशादायक निकाल समोर आले आहेत. या संशोधनातून असे दिसून आले आहे की धान, गहू आणि भाज्यांसह इतर पिकांसाठी आवश्यक आणि उपयुक्त खनिज पोषक तत्त्वांचा स्त्रोत म्हणून लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांचा वापर करण्याची क्षमता आहे.
हा सध्याचा सामंजस्य करार (MoU) पिकांचा प्रतिसाद, पोषक तत्त्वांची उपलब्धता, फायटो-टॉक्सिसिटी, पाझरण्याची वैशिष्ट्ये आणि एकूण पर्यावरणीय प्रभावाचे मूल्यमापन करण्यासाठी विविध ऋतूंमध्ये IARI, नवी दिल्ली आणि AM/NS इंडिया, किरंदुल येथे करण्यात येणाऱ्या दीर्घकालीन शास्त्रीय अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. या संशोधनाचा उद्देश भक्कम शास्त्रीय पुरावे तयार करणे हा आहे ज्यामुळे शेतीमध्ये लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांचा सुरक्षित आणि फायदेशीर वापर करणे शक्य होईल आणि त्याची खात्री मिळेल. यामुळे खाणकामातील या उपउत्पादनाच्या दीर्घकालीन साठवणुकीची गरज कमी होण्यास मदत होईल.
हे पथदर्शक संशोधनात्मक सहकार्य खाण क्षेत्रातील एका महत्त्वाच्या उपउत्पादनावर शाश्वत उपाय शोधण्याच्या उद्देशाने केले आहे, ज्यामुळे कृषी उत्पादकता आणि पर्यावरण संरक्षणास मदत होईल. प्रगत शास्त्रीय प्रयोग आणि पडताळणीद्वारे हा प्रकल्प लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांचा सुरक्षित आणि फायदेशीर वापर वाढवणाऱ्या तांत्रिक नवकल्पना देण्याचा प्रयत्न करेल, तसेच नैसर्गिक संसाधनांचे जतन, टाकाऊ घटकांचे प्रमाण कमी करणे व त्यांचे पर्यावरणीय दृष्टीने शाश्वत व्यवस्थापन करणे, रासायनिक खतांची आयात कमी करणे आणि शेतीमध्ये सर्वसमावेशक आरोग्य दृष्टिकोनाला पाठबळ देण्यासोबतच ज्या घटकांना दीर्घकालीन साठवणुकीची गरज भासली असती त्यापासून मूल्य आणि संपत्ती निर्माण करण्याच्या शक्यता निर्माण करेल.
AM/NS इंडियाच्या तंत्रज्ञान विभागाचे संचालक आणि उपाध्यक्ष हिरू इशिबाशी म्हणाले: “AM/NS इंडियामध्ये शाश्वतता आणि नाविन्यता सोबत चालतात. ICAR-IARI सोबतचे हे सहकार्य विज्ञान-आधारित संशोधनाद्वारे लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांची क्षमता पूर्णपणे वापर करण्याचा एक पथदर्शक प्रयत्न आहे. यशस्वी झाल्यास, हा उपक्रम उपउत्पादनांच्या साठवणुकीशी संबंधित पर्यावरणीय प्रभाव कमी करून शाश्वत शेती आणि साधनसंपत्तीच्या संरक्षणास पाठबळ देणारा एक फायदेशीर परिणाम साधू शकतो. उद्योग आणि समाज दोन्हीला फायदेशीर ठरणाऱ्या चक्राकार अर्थव्यवस्थेच्या उपायांना पुढे नेण्याची आमची बांधिलकी यातून दिसून येते.”
प्रकल्पाचे मुख्य संशोधक डॉ. भूपिंदर सिंग म्हणाले: “औद्योगिक उपउत्पादनांचे फायदेशीर उपयोग विकसित करण्यासाठी त्यांच्या पोषक घटकांचे शास्त्रीय मूल्यमापन करणे ही पहिली गरज आहे. वास्तविक, टाकाऊ घटकांचे मूल्यवर्धन करणे हे शाश्वत शेती आणि पर्यावरणासाठी संशोधनाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. आमच्या प्राथमिक अभ्यासाने कृषी व्यवस्थेत लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांच्या संभाव्य वापराबाबत उत्साहवर्धक संकेत दिले आहेत. AM/NS इंडिया सोबतच्या या दीर्घकालीन सहकार्यात्मक कार्यक्रमाद्वारे आमचे उद्दिष्ट कृषीविषयक कामगिरी, पर्यावरणीय सुरक्षितता आणि पोषक तत्त्वांची गतिशीलता यावर सर्वसमावेशक शास्त्रीय माहिती तयार करणे हे आहे, ज्यामुळे लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांच्या जबाबदार वापरासाठी पुरावे-आधारित मार्ग विकसित करण्यात विशेषतः निकृष्ट दर्जाच्या जमिनींची लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आणि पोषक समृद्धता (बायोफोर्टिफिकेशन) प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी शेतमालातील लोहाचे प्रमाण सुधारण्यासाठी मदत होऊ शकते.”
ICAR-IARI सोबतचे हे सहकार्य औद्योगिक उपउत्पादनांचे मौल्यवान संसाधनांमध्ये रूपांतर करण्याच्या संभाव्य मार्गांचा अधिक विस्तार करते, ज्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक फायद्यासाठी योगदान मिळते.
हा उपक्रम साधनसंपत्तीची कार्यक्षमता, टाकाऊ घटकांचे मूल्यवर्धन आणि चक्राकार अर्थव्यवस्थेच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या AM/NS इंडियाच्या व्यापक शाश्वतता धोरणाशी सुसंगत आहे. कंपनी साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर टाकाऊ स्टीलचा पुनर्वापर, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी स्टील स्लॅगचे “आकार” नावाच्या ब्रँडेड गिट्टी उत्पादनात रूपांतर करणे, झिरो लिक्विड डिस्चार्ज सिस्टीमद्वारे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पुनर्वापर आणि आपल्या कार्यामध्ये निर्माण होणाऱ्या 90% पेक्षा जास्त प्रक्रिया उपउत्पादनांचा पुनर्वापर किंवा रिसायकलिंग समाविष्ट आहे.






