
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या कॅम्पेनच्या माध्यमातून इंद्रियाचा अक्षय्य तृतीयेचे बदलणारे महत्त्व आणि मांगल्याची भावना अधोरेखित करण्याचा मनसुबा आहे. तसेच, या सणादरम्यान भारताच्या विविध भागांमध्ये ‘बडा शगुन’ आणि परंपरांना कशा प्रकारे महत्त्व दिले जाते, हे दर्शवण्याचा ब्रँडचा प्रयत्न आहे. याच माहितीच्या आधारे इंद्रिया ग्राहकांना ‘बडा शगुन’ साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, जिथे ‘बडे ऑफर्स’मुळे केवळ धार्मिक विधी म्हणून दागिने खरेदी करण्याऐवजी अधिक आनंदाने आणि मनापासून साजरे करता येतील. येथे दागिने हे केवळ वस्तू नसून आकांक्षा, भावना आणि आनंदाचे प्रतीक बनतील.
या कॅम्पेनबाबत मत व्यक्त करत इंद्रियाचे मार्केटिंग आणि व्हिज्युअल मर्चेंडाइजिंग हेड शांतिस्वरूप पांडा म्हणाले, “ही कॅम्पेन साध्या, पण प्रभावी विचारावर आधारित आहे, ते म्हणजे, अक्षय्य तृतीया हा दिवस समृद्धी आणि अथांग प्रेमाचा दिवस आहे, जिथे हा सण प्रत्येकजण आपापल्या परीने जिव्हाळ्यासह आणि अर्थपूर्णरित्या साजरा करू शकतो. अदिती राव हैदरी यांच्या नेतृत्वाखालील आणि प्रादेशिक अभिनेत्रींच्या सहयोगामुळे अधिक प्रभावी झालेली ही कॅम्पेन मानसिकतेतील सूक्ष्म बदल निदर्शनास आणते, जिथे दागिने हे केवळ सणाचे प्रतीक नसून त्या क्षणाचे वैयक्तिक आणि आनंददायी प्रतीक बनतात. आमच्या आकर्षक ऑफर्स ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार हा समृद्ध सण साजरा करण्यासाठी आमंत्रित करत आहेत.”
अक्षय तृतीयेच्या या शुभ प्रसंगी, स्पृहा जोशी म्हणाल्या: “सण मनापासून साजरे करणे आणि कुटुंबासोबत परंपरा जपणे, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. मला माझ्या पेहरावातून आपली महाराष्ट्रीयन परंपरा जपायला खूप आवडते आणि इंद्रियाचे दागिने नेमका तोच वारसा सुंदरपणे दाखवतात, जे आपल्या संस्कृतीशी जोडलेले आहेत, अर्थपूर्ण आहेत आणि अक्षय्य तृतीयेसारख्या शुभ मुहूर्तासाठी अगदी योग्य आहेत.”
ही कॅम्पेन म ३६०-डिग्री मीडियाद्वारे प्रसारित केली जात आहे, ज्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या काळात ब्रँडची भक्कम व विनासायास उत्सवी उपस्थिती दिसेल. या कॅम्पेनद्वारे, इंद्रिया दागिन्यांचे आधुनिक केंद्र म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे, असे केंद्र जे वारशाचा गौरव करते, तसेच ग्राहकांना हा वारसा अधिक अर्थपूर्ण, महत्त्वाकांक्षी आणि समृद्ध पद्धतीने व्यक्त करण्यासाठी प्रेरित करते.