किआ इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! (Photo Credit - X)
किआ इंडिया ने ऐतिहासिक टप्प्याची घोषणा करत, भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून ऑक्टोबर २०२५ मध्ये आपली सर्वात जास्त मासिक विक्री नोंदवली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या २२,३७५ युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत यंदा सुमारे ३०% वार्षिक वाढ नोंदवत, कंपनीने २९,५५६ युनिट्सचा विक्री टप्पा गाठला. हे यश भारतातील स्पर्धात्मक ऑटोमोटिव्ह (Automotive) क्षेत्रात किआची शक्तिशाली आणि शाश्वत गती दर्शवते.
किआ इंडियाच्या या मजबूत कामगिरीचे नेतृत्व ‘सोनेट’ (Sonet) ने केले आहे.
किआची पहिली ‘मेड-इन-इंडिया’ ७-सीटर मास-प्रीमियम ईव्ही कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही विशेषत: ईव्ही (Electric Vehicle) क्षेत्रात उदयोन्मुख प्रवेशक म्हणून प्रभावी ठरली आहे, ज्यामुळे किआची शाश्वत गतिशीलतेमधील वाढती ताकद दिसून येते.
या यशाबद्दल मत व्यक्त करताना, श्री. अतुल सूद, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रमुख, विक्री व मार्केटिंग, किआ इंडिया म्हणाले, “ऑक्टोबर २०२५ किआ इंडियाच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा असलेला महिना ठरला आहे. हा टप्पा लाखो ग्राहकांचा विश्वास दर्शवतो, जे किआच्या नावीन्यता आणि प्रगतीप्रती असलेल्या कटिबद्धतेवर विश्वास ठेवतात. आमचा वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करत आहे.”
ते पुढे म्हणाले, “आमच्या ईव्ही श्रेणीचे वाढते योगदान भारतासाठी भविष्याकरिता सुसज्ज, शाश्वत गतिशीलता सोल्युशन्सच्या दिशेने आमच्या वाटचालीची अधिक पुष्टी देते. या यशाने आम्हाला प्रगतीशील ड्रायव्हिंग अनुभवासाठी तंत्रज्ञान, सुरक्षितता व स्टाइलचे संयोजन असलेल्या वाहने (Vehicles) वितरित करत राहण्यास प्रेरित केले आहे.”
या विक्रमी कामगिरीसह, किआ इंडियाने मागील सर्व विक्री टप्पे पार केले आहेत आणि देशातील सर्वात विश्वसनीय व वेगाने विकसित होणारा ऑटोमोबाइल ब्रँड म्हणून आपले स्थान अधिक दृढ केले आहे. किआ इंडियाने जवळपास १०% शक्तिशाली वर्ष-दर-वर्ष (YTD) वाढीची नोंद केली आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत २,३६,१३८ युनिट्सची विक्री झाली आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत २,१५,४४३ युनिट्सची विक्री झाली होती.
या प्रभावी कामगिरीला नुकत्याच करण्यात आलेल्या जीएसटी दरांमधील सुधारणांचे पाठबळ मिळाले, ज्यामुळे परवडणारेपणा वाढला आणि सणासुदीच्या काळात वाहन खरेदी करण्याच्या भावनेला चालना मिळाली. किआ इंडियाच्या स्थिर वाढीमधून ग्राहक-केंद्रित नावीन्यतेवरील फोकस दिसून येतो, ज्याला प्रगत तंत्रज्ञान, उच्च दर्जाचा मालकीहक्क अनुभव आणि स्थानिक उत्पादन व नेटवर्क विस्तारीकरणामुळे पाठिंबा मिळाला आहे.






