
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
साखरेनंतर, सगळ्यात जास्त चर्चेत असलेला घटक म्हणजे कांदा. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात प्रकर्षाने वापरला जाणारा घटक म्हणजे कांदा. त्यामुळे याचे वाढते दर तुमच्या रोजच्या जीवनातील गणित बिघडवत आहे. त्यामुळे तुमच्या खर्चावर परिणाम होत आहे. २४ ऑगस्ट रोजी, देशभरात कांद्याचा सरासरी किरकोळ भाव प्रति किलो ४३.५३ रुपये झाला. म्हणजे हा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत ५९ टक्क्यांनी वाढला आहे. जो मागील वर्षी प्रति किलो २७.३७ रुपये इतका होता.
चेन्नईमध्ये किरकोळ भाव प्रति किलो ६० रुपये, दिल्लीत ५५ रुपये आणि कोलकातामध्ये ५३ रुपये होता. पण सरकारने सुरु केलेल्या ‘कांदा एक्सप्रेस’ मुळे बिघडणारी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. सरकार साठा किरकोळ दरात विकण्याचे धोरण आखत आहे, ज्यामुळे कांद्याच्या किमतीत घट होऊ शकते. आता पुढील काळात नेमके किती दर आटोक्यात ठेवता येतात? परिस्थितीनुसार स्पष्ट होईल.
माध्यमांच्या वृत्तानुसार, साखरेसोबतच गुळाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात घरातील गोडवा गायब होणार असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. गेल्या १५ दिवसांत, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसारख्या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये दरात जवळपास २५ टक्क्यांनी वाढले आहेत. ज्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी मिठाई महाग झाली आहे. किरकोळ बाजारात त्याचा सरासरी भाव ६५ रुपये प्रति किलो इतका झाला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या घरात जल्लोषाऐवजी हिशोबाची गणित सोडवली जाणार आहेत अशी परिस्थिती आहे.
आगामी सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी आणि जागतिक बाजारपेठेतील वाढलेल्या आयातीमुळे खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात खाद्य तेलाच्या किमती सुमारे १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रीचा दर २०० रुपये प्रति लिटरच्या वर गेले आहेत. उद्योग तज्ज्ञांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, सणासुदीच्या काळात किमती आणखी वाढू शकतात.
अंडी हे प्रथिनांचा सर्वोत्तम आणि सर्वात स्वस्त स्रोत मानले जातात. त्यामुळे त्यांच्याकडे पौष्टिक म्हणून पाहिलं जातं. राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या (NECC) अहवालानुसार, गेल्या वर्षभरात अंड्यांच्या दरात तब्बल ३५% ते ४०% नी वाढ झाली आहे. एक्स-फार्ममधील दर आता प्रति अंडे अंदाजे ₹७ वर पोहोचले आहेत. किरकोळ दर ₹८.५० ते ₹९ च्या दरम्यान आहेत. त्यामुळे देशभरात वाढलेल्या महागाईचा परिणाम सगळ्यात गोष्टींवर दिसून येत आहे.