भारतीय कुटुंबांचा 'आर्थिक कणा' ठरतोय जीवन विमा (Photo Credit- X)
”पर्सिस्टन्सी म्हणजेच विमा सुरू ठेवण्याचे प्रमाण, लाभांचे वाटप आणि आर्थिक सक्षमता यांसारख्या महत्त्वाच्या आकडेवारीमधून स्पष्ट होते की, भारतातील जीवन विमा क्षेत्र कुटुंबांसाठी संपत्तीच्या साठ्यासारखे आहे, जे रोख उपलब्धता आणि दीर्घकालीन स्थिरता या दोन्ही गोष्टी प्रदान करते. विशेष म्हणजे, विम्याद्वारे देण्यात आलेल्या लाभांपैकी 92 टक्के लाभ हे हयात असताना मिळणारे लाभ म्हणून देण्यात आले आहेत. यामधून निदर्शनास येते की, हा उद्योग संरक्षण देण्यासोबत दीर्घकालीन आर्थिक भागीदार आहे, जो कुटुंबांच्या आर्थिक सातत्याची खात्री देतो. आमच्या मोहिमांच्या माध्यमातून आम्ही व्यक्तींना जीवन विम्याच्या क्षमतेबद्दल जागरूक करत राहू, ज्यामुळे ते आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण करू शकतील आणि विश्वासार्ह आर्थिक साठा निर्माण करू शकतील,” असे भारतातील जीवन विमा कंपन्यांच्या व्यवसाय तत्त्वाचे स्पष्टीकरण देताना इन्शुरन्स अवेअरनेस कमिटी (आयएसी-लाइफ)चे अध्यक्ष कमलेश राव म्हणाले.
एकूण वितरित लाभांपैकी 2.33 लाख कोटी रूपये पॉलिसीमधून पैसे काढणे आणि सरेंडर यामुळे देण्यात आले आहेत, ज्यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 1.77 टक्केक वाढ झाली. विम्याचे पर्सिस्टन्सी रेशो प्रबळ असल्याने हे पैसे काढणे म्हणजे नियोजित एक्झिट असल्याचे दिसून येते. पॉलिसीधारक आपल्या कुटुंबाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी या निधीचा वापर करत आहेत, जसे मुलांचे उच्च शिक्षण, स्वतःचे घर खरेदी करणे किंवा परदेशात सुट्टीचा आनंद घेणे इत्यादी. जीवन विम्याकडे नेहमी आर्थिक संरक्षणाचे उत्तम साधन म्हणून पाहिले जाते, पण आता लाभार्थी या पैशांचा वापर इतर महत्त्वाच्या कामांसाठी देखील करत आहेत. मुलांसाठीचे प्लॅन्स, अॅन्युइटी पॉलिसी, आणि बाजारपेठेशी संबंधित लाभ यांसारख्या वैविध्यपूर्ण विमा उत्पादनांमुळे ग्राहक आता त्यांच्या पॉलिसीचे पैसे पुन्हा नवीन पॉलिसींमध्ये गुंतवून आपली जीवन उद्दिष्टे साध्य करू शकतात.
विम्यापोटी दिले जाणारे लाभ हे निव्वळ प्रीमियम उत्पन्नाच्या 71.92 टक्के असूनही आर्थिक सक्षमता गुणोत्तर नियामक मर्यादेच्या वर कायम आहे. आयआरडीएआयच्या 2024-25 च्या वार्षिक अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, 31 मार्च 2025 पर्यंत सर्व जीवन विमा कंपन्यांनी 1.50 च्या किमान विहित सॉल्व्हन्सी रेशोचे (नियंत्रण पातळी) पालन केले आहे. विमा कंपन्यांनी मालमत्ता-देयता जुळवणी, पुराणमतवादी मृत्युदर गृहितके आणि आयआरडीएआयने अनिवार्य केलेल्या मजबूत सॉल्व्हन्सी मार्जिनच्या माध्यमातून हे व्यवस्थापन केले आहे. जवळपास 100 टक्के क्लेम सेटलमेंट रेशोसह या आकडेवारीमधून उद्योगाची विश्वासार्हता आणि सातत्यपूर्ण लाभ देण्याची क्षमता निदर्शनास येते.
अस्थिर भू-राजकीय वातावरणासह अनेक घटक भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाकांक्षेची वारंवार चाचणी घेतील. अशा परिस्थितीत अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी देशातील नागरिकांना आर्थिक संरक्षणाची गरज आहे. निश्चितच, भारतातील जीवन विमा उद्योगाकडे देशाच्या आकांक्षांना पाठबळ देणारी आर्थिक सुदृढता आणि ताकद आहे. हा उद्योग आवश्यक आर्थिक सुरक्षा कवच प्रदान करून देशाची स्थिरता वाढवण्यासाठी आणि कुटुंबांची आर्थिक उद्दिष्टे व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी योगदान देत आहे.
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम केले लागू






