
LPG Booking
बॅगभरुन बाटल्या… Trainमधून Alcohol नेणं पडलं महागात! बिहारच्या तरुणीला अटक; काय सांगतो कायदा?
सरकारने ग्रामीण भागातील एलपीजी रिफिल बुकिंगची मुदत वाढवली होती. पण ती मुदत आता कमी केली आहे. सोमवारी सरकारने जाहीर केले की, शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये एलपीजी रिफिल बुकिंगची मुदत सारखीच असेल. राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी केलेल्या घोषणेनुसार, ग्रामीण भागातील बुकिंगची मुदतही ४५ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पर्यटन राज्यमंत्री गोपी म्हणाले की, मध्य-पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर दबाव होता. त्यामुळे शहरी भागात रिफिल बुकिंगची मुदत २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवस ठेवण्यात आली होती. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, “एलपीजी पुरवठ्याच्या परिस्थितीत सध्या होत असलेली सुधारणा आणि रिफिलच्या मागणीत झालेली लक्षणीय घट लक्षात घेता, केंद्र सरकारने हा निर्बंध शिथिल केला आहे. आता, शहरी किंवा ग्रामीण भागातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहक २५ दिवसांच्या अंतराने रिफिल बुक करू शकतील.”
होर्मुझ नाकाबंदी आणि गॅसच्या तुटवड्यामुळे दर ४५ दिवसांनी गॅसचे रिबुकिंग करण्याचा नियम करण्यात आला होता, ज्यामुळे जनतेला मोठी गैरसोय झाली होती. पण, आता नियमांमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आल्याने जनतेला, विशेषतः ज्यांना घरी अधिक गॅसची आवश्यकता आहे, त्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर मिळण्यात होणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.