सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे, भारताला LPG आयात करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारत आपल्या LPG पैकी ६० टक्के साठा हा आखाती देशांकडून आयात केला जातो.
केंद्र सरकारने माहिती दिली की, व्यावसायिक एलपीजीच्या बाबतीत सुमारे १७ राज्य सरकारांनी वाटप आदेश जारी केले असून सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा करण्यात आला आहे.
देशात ३३ कोटींहून अधिक लोक एलपीजी वापरतात, त्यामुळे पेट्रोलियम मंत्रालयाने पुरवठा कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सरकारने रिफायनरींना देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत
राज्यात एलपीजीचे संकट आणखीच गडद होत असून आता शिर्डीतून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर एलपीजी संकट असेच सुरू राहिले तर शिर्डीतील साई भक्तांना उपाशी राहावे लागणार आहे.