
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
टाटा समूह ही भारतातील एक कंपनी नाही तर नावाजलेलं व्यावसायिक घराणं आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून भारताच्या जडणघडणीमध्ये जसा इतर घटकांचा वाटा आहे तसा टाटा समूहाचा मोठा वाटा आहे. टाटा समुहाकडे व्यवसायात आदर्श आणि उच्च मापदंड प्रस्थापित करणारा समूह म्हणूनही पाहिलं जातं. नुकतीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Noel Tata नोव्हेंबरमध्ये चेअरमन पद सोडणार आहे. पण Tata Sons ची अशी कोणती Policy आहे ज्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय? समजून घेऊयात.
टाटा समूहाने असा नियम स्थापित केला आहे की, त्यांच्या कार्यकारी संचालकांना वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त व्हावे लागेल आणि गैर-कार्यकारी संचालकांसाठी वयोमर्यादा ७० वर्षे आहे. या नियमानुसार, नोएल टाटा यांनाही पुढील वर्षी पायउतार व्हावे लागेल. ते सध्या ६९ वर्षांचे असून नोव्हेंबरमध्ये ७० वर्षांचे होतील. यानंतर, त्यांना ट्रेंट लिमिटेडच्या अध्यक्षपदावरूनही पायउतार व्हावे लागेल, ज्या कंपनीचे नेतृत्व त्यांनी गेल्या ३० वर्षांपासून केले आहे.
नोएल टाटा यांनी २३ जून रोजी कंपनीच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे स्पष्ट केलं. अध्यक्ष म्हणून हे आपले अखेरचे भाषण असल्tata noelयाचे त्यांनी भागधारकांना स्पष्टपणे सांगितले. नोएल १९९८ मध्ये संचालक म्हणून ट्रेंटच्या संचालक मंडळात सामील झाले. लॅक्मेच्या निर्गुंतवणुकीनंतर त्यांच्या आई, सिमोन टाटा यांनी या कंपनीची स्थापना केली होती. पुढच्याच वर्षी, १९९९ मध्ये, नोएल यांनी ट्रेंटचे पहिले व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा महसूल १९,७०१ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
एका स्टोअरपासून सुरुवात करून, ट्रेंट आज १,२०० स्टोअर्सपर्यंत विस्तारले आहे. वेस्टसाइडमधील एकाच स्टोअरपासून सुरुवात करून, ट्रेंटने आता १,२०० स्टोअर्सचे एक मोठे जाळे निर्माण केले आहे. नोएल टाटा म्हणाले की, हा प्रवास उत्क्रांतीचे एक उदाहरण आहे. गेल्या काही वर्षांत, कंपनीने झुडिओ आणि स्टारच्या मदतीने आपला पोर्टफोलिओ सातत्याने मजबूत केला आहे आणि एक मोठे जाळे उभारले आहे. ते पुढे म्हणाले की, आतापर्यंतचा व्यवसाय पाहता हे स्पष्ट आहे की, ट्रेंटची सर्वोत्तम कामगिरी अजून व्हायची आहे. आमच्यासाठी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात संधी आहेत.
नोएल टाटा यांनी २०२३ च्या भागधारकांच्या सभेत सांगितले होते की, ट्रेंटला १० पटींनी मोठे करण्याचे त्यांचे ध्येय आहे आणि आज तेव्हापासून कंपनीची अडीच पटींनी वाढ झाली आहे. कंपनीने महसूल आणि नफ्यात अडीच पटींची वाढ साधली आहे. नोएल म्हणाले, “मला खात्री आहे की आपण हा टप्पा गाठू शकतो. पण पुढील प्रवास माझ्याशिवायच करावा लागेल.” नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखाली ट्रेंटचा रिटेल व्यवसाय भरभराटीस आला आहे आणि आज देशभरात त्याची दुकाने आहेत.
Tomato Price Hike: टोमॅटोचे भाव 70 रुपयांच्या पार, भाव कमी करण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय?