‘देश का नमक’ मागचा चेहरा कोण? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Who was Darbari Seth: भारतामध्ये असे काही ब्रँड आहेत. त्यांची आपल्याला ओळख करुन देण्याची गरज भासत नाही. त्या वस्तूचे नाव घेतले की, दुकानदार त्याच ब्रँड वस्तू आपल्याला आणून देतो.त्यापैंकी एक म्हणजे टाटा सॉल्ट. दुकानात मीठ मागितले की आपल्या डोळांसमोर येत देत म्हणजे टाटा सॉल्ड. रोज जेवणात वापरले जाणारे मीठ आजचे इतके सामान्य वाटते, त्यामागे एका दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीचे नाव ते म्हणजे दरबारी सेठ. ते टाटा समूहातील एक अत्यंत प्रभावी व्यक्ती मानले जाते. त्यांचे नाव केवळ मीठापुरते मर्यादित नव्हते. रसायन उद्योगापासून चहाच्या व्यवसायापर्यंत टाटा समूहाला पुढे नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच त्यांना ‘केमिकल किंग’ आणि ‘टी किंग’ अशी ओळखही मिळाली.
दरबारी सेठ यांनी 1943 मध्ये टाटा केमिकल्समध्ये ज्युनिअर इंजिनिअर म्हणून कामाला सुरुवात केली. त्या काळात त्यांच्यासमोर मोठ्या पदाचे स्वप्न नव्हते, पण काम करण्याची जिद्द नक्की होती. ही वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेचा मार्ग धरला.
सिनसिनाटी विद्यापीठातून त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर अमेरिकेतील Dow Chemicals मध्ये काम करताना त्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग व्यवस्थापनाचा अनुभव मिळाला. भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी पुन्हा टाटा केमिकल्समध्ये जबाबदारी स्वीकारली. याच काळात त्यांच्या कामाची खरी छाप दिसू लागली.
गुजरातमधील मिठापूर येथे टाटा केमिकल्सचा प्रकल्प उभारण्यामागे दरबारी सेठ यांची महत्त्वाची भूमिका होती. ज्या ठिकाणी उद्योग उभा करणे सोपे नव्हते, तिथे त्यांनी तांत्रिक ज्ञान आणि नियोजनाच्या जोरावर प्रकल्प उभा केला. सुरुवातीच्या अडचणी पार करत हा व्यवसाय पुढे नेणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण सेठ यांनी केवळ प्रकल्प उभारण्यावर समाधान मानले नाही. तो व्यवसाय मजबूत आणि फायदेशीर करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. याच दूरदृष्टीतून पुढे भारतातील सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या मीठाच्या व्यवसायाला नवी दिशा मिळाली.
भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या साध्या मिठाला दर्जेदार आणि विश्वासार्ह ब्रँडचे रूप देता येईल, असा विचार त्या काळात फारसा सामान्य नव्हता. दरबारी सेठ यांनी मात्र ही संधीचे सोने केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतात आयोडाइज्ड आणि व्हॅक्यूम- इव्हॅपोरेटेड मीठ ब्रँडच्या स्वरूपात आणण्याचा मार्ग तयार झाला. पुढे याच प्रवासातून टाटा सॉल्टने भारतीय बाजारात आपले स्थान निर्माण केले. त्यानंतर टाटाला ‘देश का नमक’ अशी ओळख मिळाली. टाटा मीठाची ओळख देशभर पोहोचले.
3.3 कोटींची नोकरी सोडून घेतला मोठा निर्णय! Googleचा माजी कर्मचारी आता नेमकं काय करतोय?
दरबारी सेठ यांचे योगदान फक्त टाटा केमिकल्सपुरते राहिले नाही. चहाच्या व्यवसायातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 1980च्या दशकात जेम्स फिनले कंपनीने भारतातील आपला व्यवसाय कमी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या चहाच्या मळ्यांमध्ये टाटा समूहाने संधी पाहिली. दरबारी सेठ यांच्या नेतृत्वाखाली या व्यवसायाला टाटा समूहाच्या छत्राखाली आणण्याचे काम झाले. यातून पुढे टाटा टीच्या विस्ताराला बळ मिळाले. म्हणजेच एका बाजूला मीठ आणि दुसऱ्या बाजूला चहा भारतीय घरातील दोन रोजच्या वापराच्या वस्तूंमध्ये टाटा समूहाची मजबूत उपस्थिती निर्माण करण्यात सेठ यांचा हात होता.
दरबारी सेठ यांच्या कामावर टाटा समूहाचा विश्वास किती मोठा होता, याचा अंदाज त्यांच्या जबाबदाऱ्यांवरून येतो. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 14 हून अधिक टाटा कंपन्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. याशिवाय सुमारे 20 कंपन्यांच्या संचालक मंडळावरही त्यांची भूमिका होती. टाटा समूहाशी त्यांचा संबंध तब्बल 52 वर्षांचा होता. एवढ्या प्रदीर्घ काळात त्यांनी केमिकल्स आणि ग्राहकवस्तूंच्या व्यवसायाला मजबूत पाया दिला.
Gold Silver Price Today: आज चमकलं सोनं-चांदी, 2% चांदीच्या दरात वाढ, एका रात्रीत कसे वाढले दर
8 डिसेंबर 1999 रोजी दरबारी सेठ यांचे निधन झाले. पण एखाद्या व्यक्तीचे मोठेपण त्याच्या पदावरून नाही, तर त्याने मागे काय उभे केले यावर ठरते. आज स्वयंपाकघरातील मिठाचा डबा उघडताना किंवा टाटाचा चहा कपात ओतताना कदाचित दरबारी सेठ यांचे नाव आठवत नसेल. पण या दोन्ही व्यवसायांच्या पायाभरणीत त्यांचे योगदान मोठे आहे.






