
cbsc
CBSE marks mismatch 2026: नुकतेच दिल्लीतून सीबीएसी बोर्ड संदर्भात आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये विद्यार्थ्याची गुणपत्रिका आणि उत्तरपत्रिका यामधील गोंधळ उघडकीस आला आहे. तनिष्क नावाच्या विद्यार्थ्याने असा दावा केला आहे की, १२ वीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर त्याने मार्कशीट डाउनलोड केली. तेव्हा गुणपत्रिकेत विषय लिहले होते पण कोणत्याही विषयाचे मार्क लिहले नव्हते. त्यानंतर त्याने पुनर्मुल्यांकन प्रक्रिया सुरू केली, तेव्हा त्याला कोरी उत्तरपत्रिका मिळाली. आता असेच एक प्रकरण मेरठमधूनही समोर आले आहे, जिथे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत आणि गुणपत्रिकेतील गुणामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले आहे.
आचार्य इन्टिट्यूटचे संचालक अखिलेश मिश्रा यांनी सांगितले की सीबीएसईच्या या मोठ्या गोंधळात एका विद्यार्थिनीच्या उत्तरपत्रिकेत गुण कमी होते. मात्र गुणपत्रिकेत जास्त गुण दाखवण्यात आले आहेत.
Indian Navy Recruitment: भारतीय नौदलात परीक्षा न देता अधिकारी होण्याची सुवर्णसंधी;फक्त ‘एसएसबी’ आणि मेडिकलवर होणार निवड!
मिळालेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेपेक्षा जास्त गुण मार्कशीटवर नोंदवले गेले होते. ज्या मार्कशीटमध्ये १५ गुणांपर्यंत वाढ झाल्याचे झाल्याचे दिसले. तर दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही असाच प्रकार समोर आला असून त्याचे उत्तरपत्रिकेच्या तुलनेत मार्कशीटमध्ये २२ गुणांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
या गोंधळामुळे सीबीएसईच्या मूल्यांकन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता बोर्डाच्या पारदर्शकता आणि अचूकतेच्या दाव्यावर शंका घेतली जात आहे.आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या मिळालेल्या गुणांची योग्य रीतीने तापासणी केली आहे. त्यापैकी १ टक्के असे विद्यार्थी आढळले आहेत, ज्यांनी काही ना काही त्रुटी किंवा चुका पकडल्या आहेत. अशा परिस्थितीत जर कोणत्याही विद्यार्थ्याना मिळालेल्या गुणांबाबत थोडी जरी शंका असेल तर त्यांनी उत्तरपत्रिकेतील गुणांची मार्कशीट क्रॉस-चेक करून घ्यावी, असा सल्ला अनेक शिक्षकांकडून विद्यार्थी आणि पालकांना दिला जात आहे.