
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
बऱ्याचवेळा, तरुण मुलं महाविद्यालयीन शिक्षण आणि मोठ्या मोठ्या पदव्या मिळवण्यासाठी आयुष्यातील महत्त्वाची वर्षे फुकट घालवतात. पण हे करताना आपल्याला एकीकडे प्रमुख सरकारी विभाग दहावी उत्तीर्ण स्टेजवर बऱ्याच पदांसाठी आपली वाट पाहत असतो. खरंतर कर्मचारी निवड आयोगापासून (SSC) ते ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीपर्यंत बऱ्याच विभागाता कुठेच संधींची कमतरता नाही. या प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांसाठी, पुस्तकी ज्ञानापेक्षा कठोर परिश्रम आणि आवड अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्हीसुद्धा दहावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाला असाल. तर या सरकारी नोकऱ्या तुमच्यासाठीच तर आहेत.
सर्वसाधारणपणे, सरकारी नोकर्यांसाठी डिग्रीपूर्ण करणं किंवा निदान १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असणं फार गरजेचं मानलं जातं. पण असे बरेच विभाग आहेत तथापि, अनेक विभाग १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठीही भरतीची संधी देतात. नुकतेच बऱ्याच राज्यांमध्ये १० वीच्या बोर्डचे निकाल जाहीर झाले आहेत. राजस्थान बोर्ड १०वी निकाल २०२६ आणि बिहार बोर्ड १०वी निकाल २०२६ जाहीर झाल्यानंतर आता एमपी बोर्ड, यूपी बोर्ड आणि सीबीएसईसह इतर बोर्डदेखील लवकरच त्यांचे १०वीचे निकाल जाहीर करतील. १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी असलेल्या सरकारी नोकऱ्यांचा तपशील तुम्ही खाली पाहू शकता.
10 ची परीक्षा पास झालेल्यांसाठी बऱ्याच विभागांमध्ये सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत. एसएससीपासून ते रेल्वेपर्यंत अशा बऱ्याच विभागांचा यात समावेश होतो. काही ठिकाणी तर परीक्षेशिवाय नोकरी मिळते आहे.
भारतीय टपाल विभाग : टपाल विभागातील ग्रामीण डाक सेवक पदांची भरती सामान्यतः दहावीच्या गुणांवर आधारीत गुणवत्ते वरुन केली जाते, ज्यामध्ये कोणत्याही लेखी परीक्षेची आवश्यकता नसते. तर दहावीमध्ये किती गुण आहेत यावरुन तुमची निवड केली जाते.
कर्मचारी निवड आयोग : SSC दरवर्षी मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) आणि जनरल ड्युटी म्हणजे GD कॉन्स्टेबल पदांसाठी भरती करते. 10 वीची परीक्षा पास झालेल्यांसाठी हा एक लोकप्रिय पर्याय आहे.
भारतीय रेल्वे (D विभाग) : जगातील सर्वात मोठा विभाग मानला जाणारा विभाग म्हणजे रेल्वेमध्ये ट्रॅक मेंटेनर, हेल्पर आणि इतर ‘गट ड’ विभाग या पदांसाठी १०वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
संरक्षण आणि निमलष्करी दल: दहावी उत्तीर्ण तरुण भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांचा विचार केला जातो. तसेच बीएसएफ, सीआरपीएफ आणि सीआयएसएफमधील ट्रेड्समन पदांसाठी अर्ज करू शकतात.
राज्य पोलीस आणि होमगार्ड: जवळपास प्रत्येक राज्यात, पोलीस कॉन्स्टेबल आणि होमगार्ड पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाते.
बहुतांश दहावी स्तरावरील सरकारी नोकऱ्यांसाठीची निवड प्रक्रिया दोन किंवा तीन टप्प्यांत पूर्ण केली जाते. पहिल्या टप्प्यात एक वस्तुनिष्ठ लेखी परीक्षा असते, ज्यात पुढील विषयांचा समावेश असतो. सामान्य ज्ञान, गणित, तर्कशास्त्र आणि हिंदी/इंग्रजी या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असतो. संरक्षण आणि पोलीस सेवांसाठी, दुसऱ्या टप्प्यात अनिवार्य असलेली शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजे PET चाचणी घेतली जाते. शेवटी, कागदपत्रांची पडताळणी केली जाते. आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. जर विद्यार्थ्यांनी आतापासूनच या विषयांवर प्रभुत्व मिळवण्यास सुरुवात केली, तर ते पहिल्याच प्रयत्नात तुम्ही यश मिळवून सरकारी नोकरी मिळवू शकता.