
आता जिल्हा परिषद शाळांचा १० वी पर्यंत विस्तार
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. अनेक गावांमध्ये माध्यमिक शाळा लांब असल्याने, विशेषतः मुलींना १० वी पूर्वीच शिक्षण सोडावे लागत होते. पालकांची ही अडचण ओळखून आता स्थानिक गरजेनुसार आणि विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळांचा दर्जा वाढवण्यात येत आहे.
Exclusive Series : मुली-महिलांवरील अन्याय थांबवण्यासाठी आयपीएस अधिकारी होण्याचे आरतीचे स्वप्नं
केवळ वर्गच वाढवले जात नसून, या शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोडही दिली जात आहे. जिल्ह्यात १०० हून अधिक शाळांमध्ये रोबोटिक्स, AR-VR आणि सायन्स लॅब्स उभारून जिल्हा परिषद शाळा आता खाजगी शाळांना टक्कर देण्यास सज्ज झाल्या आहेत. तसेच, पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे सुरू झालेली ‘ज्योती सावित्री’ ही पहिली जिल्हा परिषद सीबीएसई (CBSE) शाळा या परिवर्तनाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
‘ग्रामीण पुण्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गावाजवळच सातत्यपूर्ण शिक्षण मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे,’ अशा शब्दांत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रशासनाचा निर्धार व्यक्त केला. या निर्णयामुळे पालकांचा सरकारी शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला असून, जिल्हा परिषद शाळा आता खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि ‘स्वयंपूर्ण’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
“मराठी शाळा बंद पाडण्याचे शिक्षण विभागाचे षड्यंत्र”; आमदार ज. मो. अभ्यंकर यांचा खळबळजनक आरोप