
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
‘फोर्ब्स’ या एका मासिकाने तर या घटनेची नोंद एक ‘धोरणात्मक नेतृत्व संधी’ म्हणजेच strategic leadership opportunity म्हणून केली आहे. त्याचप्रमाणे, ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने आपल्या अनेक अहवालांमध्ये नमूद केले आहे की, वयस्कर व्यक्ती खरोखरच पुन्हा कामावर परतत आहेत. ‘AARP’ च्या एका सर्वेक्षणानुसार जे फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रकाशित करण्यात आलं त्यानुसार निवृत्त झालेल्यांपैकी ७% व्यक्तींनी गेल्या सहा महिन्यांत पुन्हा काम करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी हा आकडा ६% इतका होता. या गटातील ४८% व्यक्तींनी सांगितले की, आर्थिक गरजेपोटी ते पुन्हा कामावर परतले आहेत. पण नेमकी कोणती कारणं आहेत ज्यामुळे रिटार्य झालेली मंडळी पु्न्हा कामावर परतत आहेत.
निवृत्तीवेतन आणि वैयक्तिक बचतीची रक्कम आता दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पुरेशी ठरत नाहीये. परिणामी, आपली पूर्वीची जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी काम करणे आता अत्यावश्यक बनले आहे. म्हणून हा पर्याय निवडला जाण्याची शक्यता आहे.
दीर्घकाळ घरीच घालवल्यामुळे लोकांमध्ये कंटाळा आणि एकटेपणाची भावना निर्माण होऊ लागली आहे. कामामुळे मित्र आणि सहकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते, तसेच मन मिळून मिसळून राहतं आणि कामात मग्न राहते. हा मुद्दा फोर्ब्सच्या अहवालात प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आला होता. त्यामुळे हे कारण विशेष करुन अधोरेखित केलं जाऊ शकतं.
तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील तरुण व्यावसायिकांकडे जरी प्रचंड उत्साह असला, तरी संकटांवर मात करण्यासाठी आणि प्रभावी मार्गदर्शन किंवा mentorship करण्यासाठी आवश्यक असलेला सखोल अनुभव या अनुभवी ज्येष्ठांकडेच असतो. कंपन्या अत्यंत उत्सुकतेने आणि दोन्ही हात पसरून त्यांचे पुन्हा स्वागत करत आहेत.
आजकाल ‘Gen Z’ मधील व्यावसायिकांमध्ये वारंवार नोकऱ्या बदलण्याचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. याउलट, निवृत्त होऊन पुन्हा कामावर परतणाऱ्या व्यक्ती अधिक निष्ठावान कर्मचारी असतात. त्यांना सहसा फारशा प्रशिक्षणाची गरज भासत नाही आणि ते कामाच्या ठिकाणी शिस्त व स्थैर्य घेऊन येतात. हा प्लस पॉईंट समोर ठेवून कंपन्या देखील या लोकांना आनंदानं स्वीकारत आहेत.
भारतात, सरकारी नोकऱ्यांसाठी निवृत्तीचे सर्वसाधारण वय ५८ ते ६० वर्षे असते. अमेरिकेइतका हा कल अजून भारतात मोठ्या प्रमाणावर पसरलेला नसला, तरी या दिशेने निश्चितच बदल होण्यास सुरुवात झाली आहे. ‘गिग इकॉनॉमी’, सल्लागार भूमिका आणि मार्गदर्शनाच्या संधींच्या माध्यमातून, ५० किंवा ६० वर्षांहून अधिक वयाचे अनेक व्यक्ती आपल्या व्यावसायिक जीवनात एका ‘दुसऱ्या पर्वाचा’ प्रारंभ करताना दिसत आहेत. आगामी काळात, ‘सिल्व्हर इकॉनॉमी’ भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रातही दिसू शकते.