Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित

बुलढाणा जिल्ह्यात पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेला २८ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. २३१ परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडत असून कॉपीमुक्तीसाठी विशेष भरारी पथके तैनात आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 22, 2026 | 04:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

Buldhana: जिल्ह्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आज (रविवार) शिष्यवृत्ती परीक्षा पार पडत आहे. यावर्षी एकूण २८ हजार ६९ विद्यार्थी ही परीक्षा देत असून, प्रशासनाने परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी व्यापक तयारी केली आहे. यंदाची संख्या मोठी असल्यामुळे तयारीही जय्यत करण्यात आली आहे.

Washim News : गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे पालन करा! सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन

बुलढाणा जिल्ह्यात इयत्ता पाचवीसाठी १२६ परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. तसेच इयत्ता आठवीसाठी १०५ असे एकूण २३१ परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. पाचवीच्या परीक्षेसाठी १६,१६६ विद्यार्थी विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत तर आठवीसाठी ११,९०३ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेच्या पारदर्शक आणि कॉपीमुक्त आयोजनासाठी जिल्हास्तरावर विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेरा तालुक्यांमध्ये भरारी पथक कार्यरत असून, प्रत्येक केंद्रावर नियमित पाहणी केली जाणार आहे. तालुकास्तरावरही अधिकाऱ्यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क आहे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील तसेच जिल्हा समन्वयक जयमाला राठोड यांनी केंद्र संचालकांना परीक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ईश्वर वाघ, गजानन वाघ आणि श्रीकृष्ण जाधव हे सहाय्यक जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. प्रशासनाकडून सर्व केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जात असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

ठाण्यात राज्यस्तरीय वादविवाद स्पर्ध्येचे आयोजन! जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात भरली स्पर्धा

शिष्यवृत्ती परीक्षेत मिळालेल्या यशाचा पुढील जीवनात कसा होतो फायदा?

शिष्यवृत्ती परीक्षा ही केवळ एक स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या परीक्षेत यश मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते. त्यामुळे पुढील शिक्षणाचा खर्च काही प्रमाणात कमी होतो आणि विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करता येते. यासोबतच, लहान वयातच स्पर्धा परीक्षांचा अनुभव मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक ओळख वेगळी निर्माण होते, ज्याचा फायदा पुढील प्रवेश प्रक्रियेत आणि करिअरमध्ये होतो. अशा विद्यार्थ्यांना भविष्यातील मोठ्या स्पर्धा परीक्षा जसे की MPSC, UPSC किंवा इतर शासकीय भरती परीक्षांसाठी तयारी करताना आधीच मजबूत पाया तयार झालेला असतो.

शिष्यवृत्ती परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची तार्किक क्षमता, विश्लेषण कौशल्य आणि वेळेचे व्यवस्थापन सुधारते. हे गुण केवळ शिक्षणातच नव्हे तर आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडतात. तसेच, या यशामुळे पालक आणि शिक्षकांचा विश्वास अधिक दृढ होतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा विशेष महत्त्वाची ठरते. आर्थिक मर्यादा असतानाही गुणवत्तेच्या जोरावर पुढे जाण्याची संधी या माध्यमातून मिळते. त्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर पोहोचतात.

एकूणच, शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची पायरी ठरते. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर या परीक्षेत यश मिळवून विद्यार्थी उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करू शकतात.

Web Title: Scholarship exam for 5th and 8th today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news

संबंधित बातम्या

Washim News : परीक्षेच्या सीसीटीव्ही फुटेजचे जतन करा! मंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश
1

Washim News : परीक्षेच्या सीसीटीव्ही फुटेजचे जतन करा! मंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश

डीएचओ मानांकनात राज्यात बुलढाणा तृतीय! अमरावती परिमंडळात द्वितीय स्थान; आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती
2

डीएचओ मानांकनात राज्यात बुलढाणा तृतीय! अमरावती परिमंडळात द्वितीय स्थान; आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
3

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.