संग्रहित फोटो
शुक्रवारी (दि.११) रात्री मुंबईहून साताऱ्याला जात असताना कल्याणी यांच्या गाडीला संबंधितांच्या गाडीची किरकोळ धडक झाली. त्यानंतर दोघांनी कल्याणी यांची गाडी अडवून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर संबंधितांनी त्यांचा हात ओढून जबरदस्तीने आपल्या गाडीत घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचे म्हंटले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या कल्याणी यांनी प्रतिकार केला. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती कल्याणी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन दिली आहे.
किरकोळ अपघाताच्या कारणावरून महिलेशी अशा प्रकारे अरेरावी आणि जबरदस्ती केली जात असल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. नऱ्हे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.
जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार!
खर्डा येथील जातेगाव फाट्याजवळ शुक्रवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. भरदिवसा घडलेल्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तानाजी भास्कर बोराटे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.






