बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर रंगेहात पकडलं; पती घाबरला अन्...
मुंबई : पती-पत्नींमधील नातं हे विश्वास आणि प्रेमावर आधारित असते. जर दोघांपैकी कोणीही एकमेकांशिवाय तिसऱ्याच व्यक्तीशी नातं सुरू केलं तर दोघांच्यातील विश्वासाला आणि नात्याला तडा जातो. पती-पत्नींमधील नात्याचे मूळ असते ‘विश्वास’… लग्न समारंभावेळी, आपण एकमेकांवर प्रेम करण्याचे आणि विश्वासू राहण्याचे वचन देतो. पण जेव्हा तिसरी व्यक्ती त्यांच्यामध्ये येते तेव्हा तो विश्वास तुटतो. जेव्हा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती दुसऱ्या कोणासोबत दिसते तेव्हा आपण खूप दुखी होतो. अशातच आता पत्नीने लॉजवर धाड टाकून पतीला एका महिलेसोबत रंगेहात पकडले आहे. अपमानित झाल्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी मध्यरात्री ऐरोली खाडी पुलावरून उडी मारलेला हा रिक्षाचालक गुरुवारी सकाळी गाळात अडकलेल्या अवस्थेत जिवंत सापडला. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची आणि खाडीत उडी मारल्याची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाने दोन तास शोधमोहीम राबवली. तो वाहून गेल्याचे समजून तपास थांबवला, मात्र गुरुवारी सकाळी तो गाळात रुतलेल्या अवस्थेत आढळून आला.
ठाण्यातील रहिवासी हा रिक्षाचालक परस्त्रीच्या प्रेमात असल्याची पत्नीला माहिती मिळाली होती. तिने बुधवारी पतीवर पाळत ठेवली आणि तो परस्त्रीसोबत लॉजवर गेल्याचे लक्षात येताच धाड टाकली. पतीचे बिंग फुटल्याने संतप्त पत्नीने त्याला चांगलाच जाब विचारला. अपमानित झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षाचालक थेट ऐरोली खाडी पुलावर पोहोचला. त्याने तेथून पत्नीला फोन करून आपल्या चुकीची कबुली दिली. तसेच “आता आत्महत्या करतोय” असे सांगत त्याने पुलावरून उडी मारली. काही वेळातच याची माहिती नातेवाईक व पोलिसांना मिळाली. रबाळे पोलिस, ऐरोली अग्निशमन दल आणि नातेवाईकांनी जवळपास दोन तास शोधमोहीम राबवली. मात्र, तो वाहून गेला असावा असे समजून शोध थांबवण्यात आला.
गुरुवारी सकाळी मात्र खाडीपुलापासून काही अंतरावर एका तरुणाला गाळात अडकलेल्या अवस्थेत पाहून स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिस पथकाने बोटीच्या साहाय्याने त्याला बाहेर काढले. चौकशीदरम्यान तोच बुधवारी मध्यरात्री पुलावरून उडी मारणारा रिक्षाचालक असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा जीव वाचला असला तरी या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास रबाळे पोलिस करत आहेत.
भर रस्त्यात अपहरणाचा थरार
आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात पतीच्या प्रेयसीचं अपहरण करून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना गेल्या काही दिवसाखाली घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात संबंधीत महिला, तिची सासू आणि मेहुणा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.