
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
विराज हा गेल्या काही दिवसांपासून घरच्या कामांकडे दुर्लक्ष करत होता. यामुळे त्याचे आई-वडील त्याच्यावर काहीसे नाराज झाले होते. मंगळवारी सकाळी पालकांनी त्याला ‘तू घरच्या कामात मदत का करत नाहीस?’ असे विचारत थोडे रागावले. सर्वांसमोर रागावल्याने विराजच्या जिव्हारी लागले. यातून आलेल्या नैराश्यातून त्याने सकाळी कोणालाही काही न सांगता घराबाहेर पाऊल टाकले. तो थेट गावातील काळशेट शिवारातील आपल्या मालकीच्या शेतात गेला आणि तिथे एका आंब्याच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
कशी उघडकीस आली घटना
विराज हा बराच वेळ घरी परतला नाही. त्यामुले त्याच्या कुटुंबीयांनी शोध घ्याला सुरुवात केली. अखेर त्याची बहीण त्याला शोधण्यासाठी शेतात गेली असता. तिला विराज झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. हे बघताच तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली ज्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने तिथे धाव घेतली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने खाली उतरवून कडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबियांवर शोककळा पसरली असून खळबळ उडाली आहे.
बस स्थानकाजवळ तरुणाची दगडाने ठेचून हत्या; शहरात खळबळ
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बस स्थानक परिसरातून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नौशाद असे आहे. तो गांधीनगर भागाचा रहिवासी आहे. त्याचा मृतदेह बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या एका पत्र्याच्या जवळ आढळला.
Ans: विराज हरिदास भगत (वय 21) असे मृत तरुणाचे नाव आहे.
Ans: घरच्या कामावरून आई-वडिलांनी रागावल्यानंतर विराजने ते मनावर घेतले आणि नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले.
Ans: विराज बराच वेळ घरी न आल्याने शोध घेतला असता त्याची बहीण शेतात गेली आणि तो झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.