
crime (फोटो सौजन्य: social media)
Pune Crime: भिगवण अपहरण प्रकरणाला ट्विस्ट; तरुणीचा व्हिडिओ समोर, “मी मर्जीने आले”
काय घडलं नेमकं?
कोमल दहावीत शिकत होती. मंगळवारी बरनी येथील परीक्षा केंद्रावर तिचा पेपर होता. परीक्षेसाठी ती सोमवारीच महाराजचक येथील आपल्या नातेवाईकांच्या गावी गेली होती. त्या गावावरून परीक्षा केंद्र सुमारे ६ किलोमीटर अंतरावर होतं. कोमलची परीक्षा ९:३० ला सुरु होणार होती. आणि सकाळी ९ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणं बंधनकारक होतं. मात्र कोमलला परीक्षा केंद्रावर पोहोचला उशीर झाला, ती साधारण ९:१० वाजता तेथे पोहोचली. केंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. अवघ्या १० मिनिटांच्या विलंबामुळे कोमलला केंद्राच्या आत प्रवेश मिळाला नाही.
विनवणी केली पण…
परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर गेट बंद असल्याचं पाहून कोमलने गेट वाजवण्यास सुरुवात केली. कोमल वारंवार विनवणी करत होती, सर, प्लीज गेट उघडा, परीक्षा ९:३० वाजता सुरू होणार आहे. मला फक्त १० मिनिटे उशीर झाला आहे. अजून २० मिनिटं शिल्लक आहेत. माझ्या करिअरचा प्रश्न आहे. मात्र, तिचं कोणीही ऐकून घेतलं नाही. खूप प्रयत्न करूनही गेट न उघडल्याने ती निराश झाली.
धावत्या ट्रेनमधून मारली उडी
कोमल काही वेळात नदौल येथे पोहोचली आणि ट्रेनमध्ये बसली. तरेगना आणि मसौढी कोर्ट स्टेशनच्या दरम्यान महाराजचक गावाजवळ तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने कोमलला रुग्णालयात दाखल केले, मात्र तिचा मृत्यू झाला.
सोशल मीडियामुळे ओळख पटली…
सुरुवातीला कोमलची ओळख पटली नाही. त्यामुळे पोलिसांनी तिचा फोटो सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर ग्रामस्थांनी तिची ओळख पटवून कुटुंबीयांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील मंटू यादव बाहेर मजुरी करतात. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, परीक्षा नियमांच्या अति-कठोरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे
Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला छडा
Ans: ती सुमारे १० मिनिटे उशिरा पोहोचल्याने प्रवेश नाकारला गेला.
Ans: निराश झालेल्या विद्यार्थिनीने धावत्या ट्रेनमधून उडी घेतली.
Ans: परीक्षा नियमांची अति-कठोरता आणि विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण.