
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
रविवार 28 जून रोजी रात्री वृद्ध शेतकरी दाम्पत्याने चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्लं. खाऊन झाल्यांनतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पती शांताराम यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान १० दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
FDA ची टीम दाखल
मात्र नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे, या दाम्पत्याच्या मृत्यूचं कारण शोधून काढणे जिल्हा वैद्यकीय प्रशासनापुढे आव्हान बनलं आहे. सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथे अन्न व औषध प्रशासनाची (FDA) टीम दाखल झाली होती. त्यांनी संबंधित ठिकाणावरील विविध खाद्यपदार्थांचे नमुने (सॅम्पल) संकलितही करण्यात आले होते. मात्र अद्याप या विषबाधासंदर्भातील अहवाल समोर आलेला नाही. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दुचाकीला कट लागला अन् कारचालकाने पोटात खुपसला चाकू; CCTV मध्ये थरार कैद
नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून कार चालकाने एका दुचाकीस्वारावर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आला आहे. यामुळे दुचाकीस्वाराच्या पोटात थेट चाकूने वार केला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा संपूर्ण थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मनमाड शहरात खळबळ उडाली आहे.
Ans: आखतवाडे, सटाणा (नाशिक).
Ans: 10 दिवसांनी.
Ans: नाही, तपास सुरू आहे.