Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाचा थरारक हल्ला; तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा मृत्यू

चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वाढते तापमान आणि पाण्याअभावी वाघ आक्रमक झाल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. या घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 23, 2026 | 08:00 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू.
  • वाढते तापमान व पाण्याअभावी वाघ आक्रमक झाल्याची शक्यता.
  • घटनेनंतर सरकार आणि वन विभागावर टीका.
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ब्रमपुरी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्यात एकाच वेळी चार महिलांना आपले प्राण गमावले. या महिला शुक्रवारी (22 मे )सकाळच्या सुमारास तेंदु पत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. या घटनेने परिसरात भीतीची वातावरण पसरले आहे.

काय घडलं नेमकं?

गावातील १३ महिला दररोज प्रमाणे पहाटे तेंदु पत्ता संक्रानासाठी गुंजेवाही जंगलात गेल्या होत्या. जंगलात तेंडू पत्ता गोळा करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने जंगल परिसरात धाव घेतली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर हल्ला एकाच वाघाने केला की परिसरत आणखी वाघ आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाहीये. मात्र या हल्ल्यामागे ब्रह्मपुरी येथील 47 अंश सेल्सिअस पर्यंत वाढलेले तापमान हे देखील एक कारण असू शकतं, असं तज्ञांना वाटतं.

आंदेकर टोळीकडून वनराजच्या खुनातील आरोपींचे नातेवाईक टार्गेट; पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान

कारण वाघांना उन्हाचा प्रचंड त्रास होतो. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी ते पाण्यात असतात. मात्र त्याक्षणी वाघाला शरीराचे तापमान कमी करण्यासाठी पाणी मिळाले नसल्याने वागावर मानसिकतान व चिडचिडेपणा वाढला असावा. त्यामुळे त्यांनी महिलांवर हल्ला केला असावा असे तज्ञांना वाटत आहे.

घडलेली घटना हि पहिलीच 

वाघाच्या हल्ल्याची ही घटना गुंजेवाही-पवनपार या मार्गावर असलेल्या खैरीचक परिसरातील जंगलात घडली असून सर्व महिला या गुंजेवाही या गावातील रहिवासी आहे. त्या सर्व महिला भट्टी मोहल्ला वॉर्ड क्रमांक 1 येथे राहतात. हा असा हल्ला पहिलाच असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलांचे नावे अशी

कवडूबाई दादाजी मोहुर्ले (वय ४५)
अनिता बाई दादाजी मोहुर्ले (वय ४०)
संगीता संतोष चौधरी ( वय ५०)
सुनिता कौशिक मोहुर्ले ( वय ३५)

ही निव्वळ दुर्घटना नाही, तर…

दरम्यान, याच मुद्दयांवर बोट ठेवत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या चार निष्पाप भगिनींचा वाघिणीच्या हल्ल्यात झालेला मृत्यू ही निव्वळ दुर्घटना नाही, तर तो प्रशासकीय अनास्थेने केलेला घात आहे! हे सरकार नक्की झोपलंय कुठे? असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

सरकार आणि वन विभाग अजूनही कुंभकर्णासारखे झोपेत

ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी जनता पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात जाते. त्यांना सुरक्षा देणे हे वन विभागाचे आणि सरकारचे कर्तव्य नाही का? वाघ-मानव संघर्ष काही आज नवीन नाही. रोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत, निष्पाप गरिबांचे बळी जात आहेत, पण सरकार आणि वन विभाग अजूनही कुंभकर्णासारखे झोपेत आहे. जंगलावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने कोणती ठोस पावले उचलली? ॲक्शन प्लॅन कुठे आहे? वन विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

कष्टकऱ्यांच्या जिवाची किंमत शून्य का?

अधिकारी फक्त वातानुकूलित केबिनमध्ये बसून बैठका मारणार की प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काही काम करणार? कष्टकऱ्यांच्या जिवाची किंमत शून्य का? जर एखादा वाघ मारला गेला तर लगेच चौकशी समित्या बसतात, पण एकाच वेळी ४ गरीब महिलांचे बळी जातात तेव्हा प्रशासन एवढं सुस्त कसं राहू शकतं? ग्रामीण भागातील जनतेने स्वतःचा जीव मुठीत धरून किती दिवस जगायचं? सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहू नये! असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Twisha Sharma Case: ट्विशाच्या पतीला जबलपूरमध्ये अटक; हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही-पवनपार जंगलात घटना घडली.

  • Que: महिलांवर हल्ला कशावेळी झाला?

    Ans: तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या असताना हल्ला झाला.

  • Que: तज्ज्ञांनी हल्ल्यामागे कोणते कारण सांगितले?

    Ans: वाढते तापमान आणि पाण्याअभावी वाघ आक्रमक झाल्याची शक्यता व्यक्त केली.

Web Title: Chandrapur tiger attack thrilling tiger attack in chandrapur four women gathering tendu leaves killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Chandrapur
  • crime

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपूर-ब्रह्मपुरीत उष्णतेचा कहर; तापमान 47 अंशांच्या पार, नागरिक हैराण
1

Chandrapur News: चंद्रपूर-ब्रह्मपुरीत उष्णतेचा कहर; तापमान 47 अंशांच्या पार, नागरिक हैराण

Pune Crime:“तु माझी नाही झालीस तर कोणाचीच नाही”; पुण्यात तरुणीवर अॅसिड हल्ला, आरोपीला कर्नाटकातून अटक
2

Pune Crime:“तु माझी नाही झालीस तर कोणाचीच नाही”; पुण्यात तरुणीवर अॅसिड हल्ला, आरोपीला कर्नाटकातून अटक

Rajasthan Crime: मानवतेला काळिमा! आईनेच 8 महिन्यांच्या चिमुरडीला पाजला ॲसिड; तोंडातुन व नाकातून रक्त …
3

Rajasthan Crime: मानवतेला काळिमा! आईनेच 8 महिन्यांच्या चिमुरडीला पाजला ॲसिड; तोंडातुन व नाकातून रक्त …

Jharkhand Crime: नात्याला काळिमा! ९ वर्षाच्या चिमुरडीवर मावशीच्या नवऱ्याकडून अत्याचार
4

Jharkhand Crime: नात्याला काळिमा! ९ वर्षाच्या चिमुरडीवर मावशीच्या नवऱ्याकडून अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.