
ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण (Photo Credit- AI)
प्रकरणात विलास गोविंद चव्हाण (35 रा. गिरनेरा तांडा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांन फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हे १५ मार्च रोजी रात्री वळदगाव परिसरात मिरची विक्री करून दुचाकीने (एमएच-20-एफके-4526) घरी परतत होते. साम्राज्य हॉटेलजवळ त्यांना अडवून चारचाकी व दुचाकीवरील सहा जणांनी रस्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यानंतर अचानक त्यांना शिवीगाळ, मारहाण करुन जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण करण्यात आले. दरम्यान, फिर्यादीने आरडाओरडा केल्याने आरोपींपैकी एकाने चाकूने फिर्यादीच्या उजव्या दंडवार वार करुन जखमी केले. त्यानंतर त्यांना झाल्टा फाटा येथे नेण्यात आले. येथे सचिन चव्हाण यांनी माझे पैसे का देत नाही, असे म्हणत मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.
Raigad Crime: बकरीच्या वादातून हत्या; 21 वर्षे फरार आरोपी अखेर जेरबंद, रायगड पोलिसांची मोठी कारवाई
त्यानंतर सहा आरोपींनी पुन्हा त्यांना शिवीगाळ दमदाटी करुन त्यांना वाहनात बसवून भासुनाईक तांडा (ता. अंबड, जि. जालना) येथे नेले. तेथे मारहाण करुन एका खोलीत डांबून ठेवत तुझ्या भावाने पैसे दिले नाहीत, आता तू आमचे पूर्ण पैसे दे, त्यानंतर तुला आम्ही सोडन अशी धमकी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी चव्हाण यांनी आपल्या भावाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या भावाने आरोपींना 40 हजार रुपये ऑनलाईन पाठवले.
रक्कम घेतल्यानंतरही आरोपींनी उर्वरित पैशांसाठी 500 रुपयांच्या स्टॅम्पवर बॉन्ड लिहून घेतला. तसेच ठरलेल्या तारखेला पैसे न दिल्यास तुला व तुझ्या भवाला खतम करुन टाकू अशी जीवे मारण्याची धमकी देत चव्हाण यांना सोडून दिले. घटनेनंतर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सातारा पोलिस ठाण्यात अचिन चव्हाण, सचिन चव्हाण व त्यांच्या सहा साथीदारांविरुद्ध अपहरण, मारहाण, खंडणी व धमकीचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गोविद एकीलवाले करीत आहेत.