Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बालविवाहाची समस्या आजही कायम! नियोजित बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात यश

बालविवाहाचे संकट कायम असल्याचे चित्र अजून ही काही भागात दिसून येत आहे. एकाच आठवड्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाच बालविवाह नियोजित होते. मात्र, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे ते रोखण्यास यश आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 21, 2025 | 06:17 PM
बालविवाहाची समस्या आजही कायम! नियोजित बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात यश (फोटो सौजन्य-X)

बालविवाहाची समस्या आजही कायम! नियोजित बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात यश (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : बालविवाह रोखण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेळुक कातकरी वाडी येथे नियोजित असलेला बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे यशस्वीरित्या रोखण्यात आला. या कारवाई दरम्यान बालविकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, पोलीस निरीक्षक सुरेश गावित (कसारा पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या प्रतिनिधी दिपाली कांबळे, सेवा सामाजिक संस्थेचे सुरेखा विशे, पर्यवेक्षिका कसारा-१, तसेच मुख्य सेविका कविता जगताप (बीट – कसारा १, प्रकल्प – डोळखांब) यांनी संयुक्तरीत्या तात्काळ कारवाई करत बालविवाह थांबवला. विशेषतः मुख्य सेविका कविता जगताप यांनी प्रकरणाची माहिती मिळताच तत्परतेने प्रयत्न करून मोठ्या मेहनतीने हा बालविवाह थांबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

१ कॅब अन् 3 महिला, आधी कपडे काढले मग स्पर्श केला, समाधान झाले नाही म्हणून…; कोलकातामधील धक्कादायक प्रकार

जिल्ह्यातील बालविवाह रोखण्याच्या कार्यवाहीबाबतची आकडेवारी
वर्ष 2024: १८ बालविवाह प्रकरणे रोखण्यात आली
वर्ष 2025 (आजअखेर): ६ प्रकरणे यशस्वीरित्या रोखण्यात आली.
ही आकडेवारी लक्षात घेता जिल्ह्यातील जनजागृती उपक्रम आणि प्रशासनाची तात्काळ कृती यामुळे बालविवाह प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

या यशस्वी हस्तक्षेपाबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी संपूर्ण पथकाचे व विशेषतः कर्मचारी व संबंधित अधिकार्‍यांचे कौतुक करताना म्हटले की, “बालविवाहासारख्या सामाजिक संकटांवर प्रभावीपणे कारवाई करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. वेळेवर कृती करून एका बालिकेचे भविष्य वाचवणाऱ्या संपूर्ण पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”

बालविकास विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व स्वयंसेवी संस्थांनी दाखवलेली एकात्मता आणि सजगता ही समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे. जिल्हा परिषद, ठाणे मार्फत सहकार्य व जनजागृतीचे उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असून ग्रामस्थांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

काय आहे बालविवाह?

कायद्यानुसार, कोणत्याही मुलाचा विशिष्ट वयाच्या आधी विवाह करणे, म्हणजेच अल्पवयीन वयात मुलाशी लग्न करणे, हे बालविवाह आहे. प्रत्येक देशात मुलाला प्रौढ होण्यासाठी एक विशिष्ट वय निश्चित केले आहे; त्या वयाच्या आधीच्या लग्नाला बालविवाह म्हणतात. या लग्नामुळे मुलांचे बालपण हिरावून घेतले जाते आणि भविष्यात त्यांचे काय होणार आहे किंवा त्यांचे आयुष्य कसे असेल याची त्यांना काहीच कल्पना नसते.
या प्रथेला बळी पडणाऱ्या बहुतेक मुली आहेत कारण अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की मुलींचे वय खूप कमी असते आणि मुलांचे वय त्यांच्यापेक्षा खूप जास्त असते. या प्रकारच्या लग्नामुळे मुलींना आयुष्यभर मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागते. भारतात, कायदेशीररित्या, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचा आणि २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा विवाह बालविवाहाच्या श्रेणीत येतो, जो कायदेशीर गुन्हा आहे.

Navi Mumbai News: ‘ऑपरेशन शोध’ अंतर्गत 330 महिला, मुली, बालकांचा छडा

Web Title: Child marriage at veluk katkari wadi in shahapur taluka of thane district has been successfully prevented due to the vigilance of the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 06:17 PM

Topics:  

  • Child Marriage
  • crime
  • police

संबंधित बातम्या

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली
1

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…
2

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट
3

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट

Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू
4

Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.