अंबरनाथच्या जावसईमध्ये एका तरुणाने विनयभंगाच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी फिर्यादीच्या वडील आणि भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. या घटनेननंतर अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय प्रकरण?
अंबरनाथच्या जावसई परिसरात राहणाऱ्या आकाश अमरजित गुप्ता याने दोन वर्षांपूर्वी सोनल जैस्वार या तरुणीचा विनयभंग केला होता. तरुणीने त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल केला होता. हा गुन्हा दाखल केल्याने याचा बदला घेण्यासाठी आकाशने सोनलचे वडील आणि भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला. या कटासाठी आकाशचा भाऊ कन्हैय्याने वस्तरा आणला. त्याच्या साथीदाराने मोनू कश्यप आणि आदित्य जैस्वारने ब्लेड आणले आणि मित्र सिद्धार्थ गायकवाड याने अजित चौहानवर वार केले. त्यानंतर मोनू आणि आदित्यने अजित चौहानला तातडीने सेंट्रल हॉस्पिटलमधून दाखल केले.
पोलिसांनी जखमी झालेल्या अजित चौहानचा रुग्णालयात जबाब नोंदवला. त्यावेळी त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सोनल जैस्वारचे वडील नागेंद्र जैस्वार आणि भाऊ आदित्य जैस्वार (पीडितेचा भाऊ) यांनी हल्ला केल्याचा आरोप केला. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र पोलीस तपासात गुन्हा घडल्याच्या वेळी नागेंद्र जैस्वार आणि आदित्य जैस्वार घटनास्थळी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला. तेव्हा त्यांना हा कट समजला. यानंतर अंबरनाथ पोलिसांनी आकाश गुप्ता कन्हैया गुप्ता, सिद्धार्थ गायकवाड, मोनू कश्यप, आदित्य जैस्वार आणि अजित चौहान या सर्व आरोपींविरोधात कट रचणे, खोटी माहिती पुरवणे, आणि गुन्ह्याचा खोटा आरोप करणे या कलमांखाली ‘सुमोटो’ गुन्हा दाखल करत त्यांना तात्काळ अटक केली. या प्रकरणाचा उलगडा अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि डीबी पथकाचे एपीआय विजय काजारी यांच्या सातारतेमुळे झाली .
बारामतीमध्ये भीषण अपघात! डंपर खाली दुचाकी आल्याने तीन जणांचा मृत्यू
बारामतीमधील महात्मा फुले चौकात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात डंपर आणि दुचाकीच्या मधात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वडील आणि त्यांच्या दोन मुली यांच्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडली आणि तिघेही चेंगरले गेले. ही घटना 27 जुलै रोजी घडली आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे वडील ओंकार आचार्य व त्यांच्या दोन मुलींचे नावे चार वर्षाची मधुरा आणि दहा वर्षाची सई आचार्य असे आहे. ओंकार आचार्य हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी असून सध्या बारामतीतील मोरगाव रोड येथे ते वास्तव्यास होते. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालक ओंकार आचार्य यांचं पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नव्हतं. आपल्या मुलीना रस्त्यावर पडलेलं पाहून हळहळलेल्या वडील ओंकार यांनी आपल्या दोन हातांवर जोर देत उठण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या मुलींना तेवढं वाचवा असं म्हणत होते.