
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण
कॉम्रेड गोविंद पानसरे हे डाव्या चळवळीतील विचारवंत होते. त्यांची हत्या १६ फेब्रुवारी २०१५ रोजी झाली होती. कोल्हापूरमध्ये सकाळच्या सुमारास फेरफटक्यानंतर घरी परतत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात पानसरे गंभीर जखमी झाले होते. तर त्यांच्यासोबत असलेल्या उमाताई पानसरे यांनाही दुखापत झाली होती. गोविंद पानसरे यांचा उपचार सुरु असताना २० फेब्रुवारी २०१५ रोजी यांचे निधन झाले.
पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) गठीत केली. एसआयटीने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना अटक केली होती. मात्र, पानसरे कुटुंबीयांनी असमाधान व्यक्त करत एसआयटीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला. त्यांनी हा प्रकरण एटीएसकडे वर्ग करावा, अशी मागणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यावर सुनावणी करत 2022 मध्ये उच्च न्यायालयाने या हत्याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्याचे आदेश दिले होते.
यानंतर, 9 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर सत्र न्यायालयाने या प्रकरणात दहा संशयितांविरोधात हत्या आणि हत्येचा कट रचल्याचे आरोप निश्चित केले होते. या आरोपींमध्ये समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे, सचिन आंदुरे, वासुदेव सूर्यवंशी, अमित डेगवेकर, गणेश मिस्कीन, अमित बद्दी, शरद कळसकर आणि भरत कुरणे यांचा समावेश होता.
या हत्याकांडाशी संबंधित सर्व 12 संशयितांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यातून समीर गायकवाड हा देखील होता. चार वर्षांपूर्वी समीर गायकवाड हा जामिनावर बाहेर आला होता. गेली चार वर्ष तो सांगलीतील विकास चौक परिसरातील आपल्या घरी राहता होता. १९ जानेवारीला त्याला त्रास जाणवू लागला. त्याला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. समीर गायकवाड याच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांना मिळताच कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
Ans: पहाटे सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
Ans: 2015 मधील विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी होते.
Ans: या प्रकरणातील सर्व आरोपी जामिनावर असून तपास एटीएसकडे आहे.