
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
गावकऱ्यांना एका शेतात निष्पाप मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोस्टमार्टम रिपोर्ट्सच्या आधारे याप्रकरणाचा तपास सुरु केला. तपासात पोलिसांना एका महिलेवर संशय आला. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली. सुरुवातीला महिलेने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कठोर चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली.
पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
कारण काय?
आरोपी महिलेने पोलिसांसमोर कबूल केलं की तिने मुलीचा गळा दाबून खून केला होता. तिने आधी मुलाचं अपहरण केलं, नंतर तिच्या आईचा बदला घेण्यासाठी त्याची हत्या केली.तिने सांगितलं की तिला तिच्या पतीचा मृत मुलीच्या आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयामुळे तिने हत्येचा कट रचला.
कशी केली हत्या?
आरोपी महिलेने आधी मुलाचं अपहरण केलं, त्यानंतर तिच्या आईचा बदला घेण्यासाठी चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली.त्यानंतर महिलेने बाळाचा मृतदेह पांघरुणात गुंडाळून सुमारे १० दिवस घरात लपवून ठेवला. मात्र मृतदेहाला वास येऊ लागल्याने तिने तो शेतात फेकून दिला.
पोलीस तपास सुरु
तिच्या कबुलीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
मोबाइलवरून पती-पत्नीमध्ये वाद! दुसऱ्या दिवशी पत्नीचा सापडला मृतदेह…
पती-पत्नी मध्येवाद होणं हे साहजिक आहे. मध्यप्रदेशच्या भोपाळ मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलच्या कारणावरून पती- पत्नीमध्ये वाद झाला आणि दुसऱ्याच दिवशी पत्नीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला. दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्ट्सच्या प्रतीक्षेत आहेत.
Ans: मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील निवारी गावात.
Ans: पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याच्या संशयातून सूड म्हणून हत्या.
Ans: टेक्निकल तपासानंतर आरोपी महिलेला अटक करून गुन्हा नोंदवला.