
मुलीला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आईची हत्या; विटेने मारहाण केली अन्...
बीड : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात आता बीडमध्ये मुलीला मारल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका महिलेची हत्या झाली. अंबाजोगाई येथील चनई वराड वस्तीतील महिलेला विटेने मारहाण केली. या घटनेत तिचा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचारदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी, आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
यशोदा बालाजी राठोड असे मृत महिलेचे नाव असून, या महिलेच्या मुलीला आरोपीने मारहाण केली होती. या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेली असता सुभाष लष्करे याने शिवीगाळ करत वीट फेकून मारली. त्यात महिला गंभीर जखमी झाली. दरम्यान, हे भांडण सोडवायला गेलेल्या राणी राठोड यांनाही आरोपीच्या मुलांनी काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणप्रकरणी राणी बालाजी राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुभाष लष्करे, मंदाकिनी सुभाष लष्करे, विश्व सुभाष लष्करे आणि इंद्र सुभाष लष्करे या चौघांविरोधात अंबाजोगाई शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमीन मोजणीवरुन वाद
या खून प्रकरणातील एक आरोपी अटकेत असून, उर्वरित तीन आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात काही वेळ ठिय्या दिला. पालघर जिल्ह्याच्या डहाणूमधील वरोती येथे खासगी जमीन मोजणीदरम्यान पोलिसांकडून आदिवासींना मारहाण करण्यात आली.
पोलिसांकडून आदिवासींना मारहाण
पोलिस बंदोबस्तात मोजणी सुरू असताना हरकत घेणाऱ्या आदिवासींना मारहाण करण्यात आली असून, मुख्य रस्त्यावर पडेपर्यंत मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजेच महिलांना देखील पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. आमची जमीन पोलीस बंदोबस्तात मोजत असल्याचा आदिवासींचा आरोप आहे.
गुप्तधनासाठी व्यापाऱ्याचा नरबळी
मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात गुप्तधनाच्या हव्यासापोटी एका व्यापाऱ्याचा नरबळी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रल्हाद साहू नावाच्या कथित तांत्रिकाने त्याचा मुलगा टीकम साहू आणि साथीदार करीम खान यांच्यासोबत मिळून व्यापारी विजय जैन यांची हत्या केली.