
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं काय घडलं?
मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजताच्या सुमारास वडाळ्यातील कोकरीपाडा परिसरात होळी खेळल्यानंतर चार आरोपी एकत्र बसून दारू पीत होते. वातावरण शांत होते, पण त्याच वेळी तुषार आपल्या एका मित्रासोबत तिथून जात होता. यादरम्यान चालता चालता तुषारचा पाय एका आरोपीच्या पायाला लागला. केवळ याच छोट्याशा कारणावरून त्यांच्यात वाद सुरु झाला. आरोपींनी तुषारला शिवीगाळ केली. त्यानंतर तुषार घरी गेला आणि त्याने आपल्या मोठ्या भावाला संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर तुषार भावासह पुन्हा घटनास्थळी पोहोचले. त्यावेळेस वातावरण अधिकच तापले.
Accident News: तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू; अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर…
बेदम मारहाण करण्यास सुरवात केली
चार तरुणांनी मिळून तुषारला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथा-बुक्क्यांनी मारले गेले, ज्यामुळे तुषारला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत परिस्थिती बिघडली होती. तुषारला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वादळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
भांडुप हादरलं! खेळायला गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा तलावात मृतदेह, पोस्टमार्टम अहवालानं उघडला खूनाचा प्रकार
मुंबईच्या भांडुप येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांनीच अल्पवयीन मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव सिद्धार्थ लोंढे ( 14 वर्ष) असे आहे. त्याच्या तीन अल्पवयीन मित्रांनीच त्याची हत्या केली असे तपासात निष्पन्न झाले आहे. सिद्धार्थचा मृतदेह मुलुंडच्या विहार तलावाजवळ आढळून आला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटले, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या असल्याचे स्पष्ट झाले.
Ans: मुंबईतील वडाळा परिसरात ही घटना घडली.
Ans: चालता चालता पाय लागल्यामुळे वाद सुरू झाला.
Ans: चार आरोपींना अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.