
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
उन्हाळ्यात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तिघे जण रत्नागिरी येथील खेड येथे आपल्या नातेवाईकांसोबत नदीत पोहण्यासाठी गेले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. पोलिसांनी रेस्कू पथकाच्या मदतीने परिस्थिती हाताळली. बचावकार्यादरम्यान एका तरुणाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेने खेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर हादरलं! 19 वर्षीय मुलाने झोपेतच वडिलांच्या डोक्यात दांडा घालून केली हत्या
या घटनेत मृत्यू झालेल्या तिघांचा नाव आकाश कांबळे, नरेश कांबळे आणि कैलास कांबळे असे आहे. हे तिघेजण मूळचे सांगली जिल्ह्यातील आहे. मात्र ते अनेक वर्षांपासून मुंबईतील कुर्ला येथे राहत होते. उन्हाळ्यात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ते रत्नागिरीतील खेड येथे आपल्या नातेवाईकांसोबत नदीत पोहण्यासाठी गेले असता काळाने घात केला. संबंधित घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेनं खेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
चिपळूणमध्ये एसीबीची धडक कारवाई! गर्भपाताच्या गोळ्यांसाठी लाच घेताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर रंगेहात अटकेत
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथून वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याचे समोर आले आहे. गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्यांचे किट देण्यासाठी लाचेची मागणी डॉ. कांचन मदार यांनी केली मात्र याच्या तक्रारीनंतर एसीबीने तातडीने सापळा रचून ही कारवाई केली.
Ans: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील जगबुडी नदीत ही घटना घडली.
Ans: आकाश कांबळे, नरेश कांबळे आणि कैलास कांबळे अशी मृतांची नावे आहेत.
Ans: नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.