
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
गुरुवारी पहाटे सुमारे ५.१० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत काही क्षणांतच रौद्र रूप धारण केल्याचे समोर आले आहे. गोठ्यातील जनावरांना बाहेर काढण्यास वेळ मिळाला नाही. (Ratnagiri News) त्यामुळे या आगीत २५ मुख्या जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन पथकाच्या अथक प्रयत्ननानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. (Ratnagiri News)
या दुर्घटनेत पशुपालकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे जिवंत जळून मृत्युमुखी पडली, तर दोन म्हशींना वाचविण्यात यश आले. ही आग कश्यामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरु आहे. उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेली जनावरे गमावल्याने पशुपालक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Ratnagiri News)
गुटखाबंदी असतानाही लोटे परिसरात लाखोंचा गुटखा साठा? खेडमध्ये कथित स्टिंग ऑपरेशनमुळे खळबळ
राज्यात गुटखाबंदी लागू असताना खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा साठवणूक व वितरणाचे कथित रॅकेट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संजय आखाडे यांनी केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनमधून हा प्रकार उघड झाल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोटे एमआयडीसी परिसरातील एका गोदामामध्ये लाखो रुपयांचा गुटखा साठवून ठेवण्यात आला असून, रात्रीच्या वेळी दुचाकींच्या माध्यमातून त्याचे विविध भागांत वितरण केले जात असल्याचे कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. राज्यात गुटखाबंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा आणि वितरण सुरू असल्याच्या आरोपांमुळे संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Ahilyanagar Crime: प्रेयसीचा खून करून दोन दिवस मृतदेह घरात लपवला, नंतर जंगलात जाळला; थरारक हत्याकांड
Ans: १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे अशा एकूण २५ जनावरांचा मृत्यू झाला.
Ans: खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे ही घटना घडली.
Ans: अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली असून आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.