काय घडलं नेमकं?
मृत्यू झालेल्या वृक्ष महिलेचं नाव मालन विलास काळे (वय 60) अशी आहे. तर नातू सुजित युवराज काळे (वय 13) अशी आहे. हे दोघेही शेळ्या चारण्यासाठी बेंदी शिवारात गेल्या होत्या. तेव्हा एका शेळीचा पाय वीजेच्या तारेत अडकून पडला होता. विद्युत प्रवास सुरू असताना शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू लागली होती. हे बघून सुजित तिला वाचवण्यासाठी पुढे गेला. मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला. तो विजेच्या तारेला चिकटून तडफडू लागला होता.
पुण्यात बिष्णोई गँगची दहशत! फुरसुंगीतील गोळीबारानंतर आणखी एकाला खंडणीसाठी धमकी
आजीच्या डोळ्यासमोर नातू मरणाशी झुंज देत होता. हे पाहून आजी मालन यांनी कोणताही विचार न करता, वाचण्यासाठी पुढे सरसावली. मात्र, दुर्दैवाने त्यांनाही शॉक बसला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यासोबतच शेळी आणि नातवाचा देखील मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित…
हातात हात घेऊन बसलेली आजी आणि नातवाचे मृतदेह पाहून नागरिकांचे डोळे पाणावले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याची माहिती दहिवड पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, प्रकरणाता नेमका निष्काळजीपणा कोणाचा? याबाबत चौकशीची मागणी जोर धरू लागलेली आहे.
ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त
सातारा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कराड शहरात वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी कारवाई उघडकीस आली आहे. नेहमीप्रमाणे वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू असताना एका ट्रॅव्हल्सवर संशय आल्याने पोलिसांनी तपासणी केली आणि त्यातून तब्बल 150 किलो चांदी तसेच 40 लाख रुपयांची रोकड सापडली. या साडेतीन कोटींच्या मुद्देमालामुळे व्यापारी आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.
Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
Ans: ही घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मार्डी गावात घडली.
Ans: मृत महिलेचे नाव मालन विलास काळे आणि नातवाचे नाव सुजित युवराज काळे होते.
Ans: शेळीला वाचवताना वीज प्रवाह असलेल्या तारेचा धक्का लागल्याने आजी आणि नातवाचा मृत्यू झाला.





