
crime (फोटो सौजन्य: social media)
Telangana Crime: विकृत मानसिकतेचा कळस! मुलगाच हवा आहे म्हणत बापानेच मुलींसह पत्नीचा जीव घेतला
काय घडलं नेमकं?
मुंबईहून माळशिरसकडे जाणारी कार शुक्रवारी पहाटे सुमारे चार ते पाचच्या दरम्यान जुन्या पालखी मार्गावरील पुलावरून जात होती. यावेळी चालकाला झोप आली आणि यामध्येच कारवरील ताबा सुटून थेट कालव्यात जाऊन पडली. हा अपघात एवढा भीषण होता कि कारमधील प्रवासी बाहेर देखील पडू शकले नाहीत. यामध्ये कारमधील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दोन चिमुरड्यांवरून आईच्या मायेचं छत्र हरपलं
या अपघातात मुंबई येथील हनुमंत जठार, मंजुळा जठार आणि प्रीती टिळेकर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहेत. यातील जठार दाम्पत्य हे प्रीती टिळेकर यांचे आई- वडील आहेत. तर गाडी चालवणाऱ्या जावई हा देखील गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे टिळेकर यांच्या दोन चिमूरड्या मुलांवरही आभाळ कोसळले आहे. ही घटना शनिवारी घडली असून यानंतर पोलिसांनी तात्काळ निरा उजव्या कालव्यातून कार बाहेर काढून मृतदेह देखील बाहेर काढले आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
Ans: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात कोसळली.
Ans: तीन जणांचा मृत्यू झाला.
Ans: कार चालवणारे जावई गंभीर जखमी आहेत.