
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
सचिन देशमुख असे हत्या झालेल्या महिलेचा नाव आहे. तर मृत्यू झालेल्या महिलेचे नाव उषा विजय साठे असे आहे. उषा ही शेतामध्ये काम करत होती. त्याचवेळी महिलेवर गोळीबार करत तिची हत्या केली. त्याने हत्या का केली याची माहिती अद्याप मिळालेली नाही आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पुढील तपास करत आहे. (Solapur Crime)
शेतजमिनीच्या वादातून 55 वर्षीय शेतकऱ्याची तलवारीने हत्या; सख्ख्या भावानेच केला सपासप वार
सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेत जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सख्ख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनीच ५५ वर्षीय शेतकऱ्यावर सपासप वार करत संपवले. घडलेली घटना कामती खुर्द परिसरातली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
संजय नागनाथ शिंदे (५५) असे हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी संजय शिंदे हे दुचाकीने आपल्या शेतात गेले होते. तिथे शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. हा हल्ला इतका जोरदार होता की संजय शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. असा आरोप मृतकाच्या मुलाने केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. (Solapur Crime) या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संजय शिंदे यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
Ans: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे ही घटना घडली.
Ans: गोळीबारात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव उषा विजय साठे आहे.
Ans: हत्येमागील नेमके कारण काय होते आणि आरोपीने गोळीबार का केला, याचा अकलूज पोलीस तपास करत आहेत.