
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं घडलं?
या प्रकरणातील आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव संतोष बकाल (३५) असे आहे. तर त्यांची पत्नी इंद्रायणी बकाल आणि 7 वर्षीय जान्हवी बकालसह 5 वर्षीय मुलगा सोहम बकाल असे विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची नाव आहे. त्यानंतर स्वतः संतोष बकालने महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीवन संपवलं. इंद्रायणीसह दोन्ही चिमुकल्या मुलांचे हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती गावात आगीसारखी पसरली शिरपूर जैन पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहे. एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी मृत इंद्रायणीच्या भावाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. संतोषचा भाऊ संपत्तीवरुन नेहमी संतोष आणि त्यांच्या पत्नीसोबत वाद घालत मारहाण करत असल्याचा आरोप मृतक महिलेचा भाऊ सुधाकर इंगोले यांनी केले. यामुळे आता या प्रकरणाचा गूढ आणखी वाढला आहे. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच प्रकरण नेमकं काय घडले हे स्पष्ट होईल.
मालमत्तेच्या वादातून भररस्त्यात मुलानेच केली बापाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् नंतर…
मालमत्तेच्या वादात न्यायालयाने घराचा ताबा वृद्ध आई-वडिलांच्या बाजूने देण्याचा आदेश दिला; मात्र याचाच राग मनात धरून पोटच्या मुलाने केवळ एका तासाच्या आत 84 वर्षीय वृद्ध वडिलांना धारदार शस्त्राने वार करून संपवले. ही घटना छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरातील अबरार कॉलनी येथे घडली आहे.
जाफर कमरुद्दीन पटेल सय्यद (वय ८४) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी मुलगा अब्दुल रहेमान अब्दुल जाफर याला अवघ्या दीड तासात बेड्या ठोकल्या आहेत. मृत जाफर सय्यद हे जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना पत्नी, चार मुली आणि तीन मुलगे असा मोठा परिवार आहे.
धाराशिव तालुक्यातील खून प्रकरणातील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटकत केली कारवाई
Ans: तिवळी गावात पतीने पत्नी आणि दोन मुलांना विहिरीत ढकलल्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना समोर आली.
Ans: पत्नी आणि दोन्ही चिमुकल्या मुलांचे मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीत आढळले.
Ans: मृत महिलेच्या भावाने संपत्तीच्या वादातून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.