काय घडलं नेमकं?
शिवानी पंकज जाधव (६) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. शुक्रवारी २० मार्च रोजी सकाळी तिला आरोपींनी टरबूज खाण्यासाठी घरात बोलावले. शिवानी व तिचा लहान भाऊ दोघेही तेथे पोहोचले. आरोपी सोनू विलास जाधव याचा टरबूज विक्रीचा व्यवसाय असल्याने त्याने दोघांना टरबूज दिले. शिवानी तेथेच थांबली, तर तिचा भाऊ हा घराकडे निघून गेला. त्यानंतर तिच्या नाकातील नथ बळजबरीने आरोपी सोनू जाधव याच्या मुलीने काढून घेतली. त्यांनतर घडलेला सगळा प्रकार शिवानी घरी सांगणार असे त्याला वाटले, याच भीतीतून तिचा गळा आवळून तिला ठार केले. नंतर तिचा मृतदे पोत्यात भरून घरातील पलंगाखाली ठेवला.
Ashok Kharat प्रकरणात वैभव नाईक यांची मोठी मागणी; म्हणाले…
मात्र उशीर झाला तरीही शिवानी घरी परतली नाही, कुटुंबीयांनी शोध-शोध केली असता सापडली नाही. कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध शाखांच्या आठ टीम तयार करून सर्वत्र शोध घेतला. गावातील संशयितांची घरझडती घेतली, तरीही शिवानीचा थांगपत्ता लागत नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी शिवानीच्या शेवटच्या लोकेशनवर लक्ष केंद्रित करून तपास सुरू करण्यात आला.
सोनू जाधव याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी शिवानी गावा बाहेर जाताना दिसल्याचे सांगितले. मात्र, यावेळी सोनू सोबत असणाऱ्याने आम्हाला कुणीच दिसले नाही असे सांगताच, सोनू जाधव खोटा बोलत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी कसून शोध घेतला, तेव्हा शिवानीचा मृतदेह विलास जाधव याच्या घरात आढळून आला.
आरोपीचा ऑटोने गावोगावी फिरून टरबूज विक्रीचा व्यवसाय आहे. शिवणीचा हत्या केल्यांनतर दुसऱ्या दिवशी सकाळी याच टरबुजाच्या ऑटोत पोत्यात भरलेला मृतदेह टाकून विल्हेवाट लावण्याचा कट रचण्यात आला होता. परंतु, शनिवारी सकाळी पोलिसांनी कुणालाच गावाबाहेर पडू दिले नाही. त्यामुळे व्हिलेवाट लावल्याचा प्रयत्न उधळला.
आरोपी अटकेत
ही थरारक घटना पोलिसांनी शनिवारी दुपारी उघड केली. बेपत्ता शिवानीचा मृतदेह पाहून संपूर्ण बोथ गाव हळहळले. या गुन्ह्यातील नराधम कैलास विलास जाधव (३०), माला कैलास जाधव (२६), सोनू विलास जाधव (३२), रंजना सोनू जाधव (३०) आणि एक विधी संघर्ष मुलगी, यांना ताब्यात घेतले. तपास अधिकारी शिवप्रकाश मुळे यांनी रविवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, ५ एप्रिलपर्यंतची पोलिस कोठडी दिली आहे.
इन कॅमेरा उत्तरीय तपासणी
शिवानीच्या मृतदेहाची यवतमाळ येथे इन कॅमेरा उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर रविवारी सकाळी साडेअकरा वाजता मृतदेह बोथ येथे आणून अंत्यसंस्कार केले. यावेळी संपूर्ण गाव जमा झाले होते, तीच्या कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. एका क्षुल्लक दागिन्यासाठी चिमुकलीला मारून टाकण्यात आल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करण्यात आले आहे.
Crime News: किरकोळ वाद झाला म्हणून एका तरुणाला थेट…; संगमेश्वरमधील धक्कादायक घटना
Ans: मुलीच्या नाकातील सोन्याच्या नथीसाठी तिची हत्या करण्यात आली.
Ans: आरोपींच्या घरात पोत्यात लपवलेल्या अवस्थेत सापडला.
Ans: एकाच कुटुंबातील 5 जणांना अटक करून तपास सुरू केला आहे.






