
फोटो सौजन्य - Social Media
Akshay Kumar : वाटलं original निघाला remake! खिलाडीचा ‘हैवान’, ‘या’ दाक्षिणात्य सिनेमाची कॉपी
कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आमिर खानला खडेबोल सुनावले आहेत. तो म्हणतो की “मला आता काही अपेक्षा राहिली नाही. ज्या माणसाच्या नावावर तुम्ही कोट्यवधींची रक्कम कमावली, त्या माणसासाठी तुमच्या तोंडातून एक शब्द निघत नाहीये. मग तुमच्याकडून आम्ही कायच अपेक्षा करणार? तसेच या लोकांकडून अपेक्षा ठेवण्याची गरजही नाहीये. कारण नुकसान यांचं नाही, देशातील सामान्य माणसांचं होणार आहे. पेपर लीक झाल्यावर सामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान होतात. यांच्या मुलांचे नाही. यांच्या मुलांना तर हे लोकं सिनेमात लाँच करून टाकतात. कुणाचं करिअर खराब होतं? सामान्य माणसांच्या मुलांचे!”
पुढे अभिजीत सांगतात की “आपण यांच्या सिनेमांना कोट्यवधींची कमाई करून देतो आणि जेव्हा आपल्याला गरज असते, तेव्हा हे लोकं येत नाहीत.” संपूर्ण देशभरातून आमिर खानबद्दल राग व्यक्त केला जात आहे. 5 जुलै रोजी आमिरने लग्न उरकलं. त्यानंतर देशातील अनेकांनी आक्षेप नोंदवला कारण आमिरचे हे तिसरे लग्न होते. या महिन्याभरात आमिर खान चर्चेच्या झोत्यात राहिला आहे.