
Aishwarya Narkar: भूमिका पडली महाग! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्यांनी साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं. मालिकेत त्या विरोधी भूमिकेत होत्या आणि त्यांच्या अभिनयामुळे अनेकांना त्या खऱ्या आयुष्यातही तशाच आहेत, असं वाटू लागलं. याच कारणामुळे सोशल मीडियावर त्यांना अनेक प्रतिक्रिया देऊ लागल्या होत्या. एका मुलाखतीमध्ये त्यांनी या सर्व टीकांचा खुलासा केला.
यावेळी त्या म्हणाल्या की, मालिका सुरू असताना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक विचित्र कमेंट्स येत होते. काहीजण त्यांच्या पात्रावर इतके नाराज होते की त्यांनी अतिशय कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिल्या. की ही बाई मरत का नाही… हीचा अपघात का होत नाही.. अश्या सर्व कमेंट्स येऊ लागला होत्या. सुरुवातीला हे वाचताना धक्का बसला, मात्र नंतर त्यामागचा अर्थ त्यांना समजला. लोक त्या पात्राचा इतका तिरस्कार करत होते, म्हणजेच त्यांनी साकारलेली भूमिका प्रभावी ठरली होती.
ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. प्रत्येक पात्रासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या अभिनयातील सहजपणा आणि संवादफेक यामुळे त्या प्रत्येक भूमिकेत उठून दिसतात.
दरम्यान, आता त्या पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर नव्या भूमिकेत दिसणार आहेत. स्टार प्रवाहवरील ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या नव्या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेत त्यांची भूमिका कशी असेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याआधी त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या असल्यामुळे या नव्या मालिकेकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
प्रेक्षकांचं प्रेम, टीका आणि प्रतिक्रिया या सगळ्याच गोष्टी कलाकाराच्या प्रवासाचा भाग असतात. ऐश्वर्या नारकर यांनीही हेच अनुभवातून शिकल्याचं सांगितलं. त्यांच्यासाठी पुरस्कारांपेक्षा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजही त्या प्रत्येक भूमिकेत पूर्ण ताकदीने काम करताना दिसतात. त्यांच्या नव्या मालिकेची चाहत्यांना आता उत्सुकता लागली असून, पुन्हा एकदा त्या आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.