
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच मालिकांच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार असल्याची चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांच्या आवडीच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ जूनपासून ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका नव्या वेळेत प्रसारित होणार आहे. मालिकेच्या टाइम स्लॉटमध्ये बदल झाल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्टार प्रवाहने नुकतीच विसरू नको तू मला या नवीन मालिकेच्या प्रसारणाची वेळ अन् तारीख जाहीर केली आहे. ही नवीन मालिका सायंकाळी सात वाजता प्रसारित केली जाणार आहे. सध्या या स्लॉटला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रसारित केली जात आहे. आता सात वाजता नव्या मालिकेची घोषणा झाल्यानंतर या मालिकेचे काय होणार असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.
येत्या २९ जूनपासून जिवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याची प्रेमकहाणी दुपारच्या सत्रात पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल करण्यात आला असून, सात वाजताचा स्लॉट आता नवीन मालिकेसाठी दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.गेल्या काही महिन्यांपासून ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेच्या टीआरपीमध्ये मोठी घसरण झाल्याची चर्चा होती. ही मालिका टीआरपीच्या टॉप-१०मध्येही स्थान मिळवू शकली नाही. त्यामुळेच वाहिनीने टाइम स्लॉटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र मालिकेला निरोप दिला जाणार नसून, जिवा आणि नंदिनीची गोष्ट नव्या वेळेत सुरू राहणार आहे. त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
येत्या २९ जूनपासून ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका दुपारी १ वाजता प्रसारित केली जाणार आहे.मालिकेच्या वेळेत बदल झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली होती. मात्र जिवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याची प्रेमकहाणी आता नव्या वेळेतही प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहणार आहे.स्टार प्रवाहच्या वेळापत्रकातील या बदलामुळे नवीन मालिकांसाठीही जागा निर्माण होणार असून, २९ जूनपासून वाहिनीवर नवा अध्याय सुरू होणार आहे.
प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिका पुन्हा झळकणार
मात्र ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका दुपारी १ वाजता शिफ्ट झाल्यानंतर आता त्या स्लॉटमध्ये सध्या प्रसारित होणाऱ्या ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे. समृद्धी केळकरची ही मालिका आता संपणार का, असा प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.मात्र याबाबत स्टार प्रवाह वाहिनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमकी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.