
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कोल्हापूरच्या न्यायालयात सुरू असलेल्या एका मोठ्या खटल्याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. खोट्या आरोपांमुळे निर्दोष व्यक्तींना अन्याय सहन करावा लागतो, ही वास्तवातील वेदना आता सन मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘जुळली गाठ गं’ मधून ठळकपणे प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या मालिकेत सावीवर ओढावलेल्या संकटामुळे कोल्हापूरसह अनेक ठिकाणी #JusticeForSavi असे बॅनर झळकताना दिसत आहेत.
Dhurandhar 2 चा टीझर प्रदर्शित होताच अडचणीत! ड्रोन प्रकरणात लोकेशन मॅनेजरवर गुन्हा दाखल
काही दिवसांपूर्वी सावीच्या आयुष्यात अंगद नावाचा व्यक्ती आला. भाऊंचा विद्यार्थी असल्याचं भासवत, स्वतःच्या व्यवसायासाठी मदत मागणाऱ्या अंगदवर सावीने विश्वास ठेवला. मदतीचा हात देताना सावी नकळत एका गंभीर कटात अडकते. काही वेळातच तिच्यावर अंगदला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि त्याचा विनयभंग केल्याचा खोटा आरोप ठेवण्यात येतो. परिणामी सावीला अटक करण्यात येते आणि तिचं आयुष्य एक नवीन वळण येत.
मात्र या सगळ्यामागे एक मोठं षड्यंत्र दडलेलं आहे. सावीला धैर्यच्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी दामिनीनेच हा सगळा कट रचल्याचं उघड होत आहे. धैर्यचा सावीवर पूर्ण विश्वास असला तरी त्याच्या आजारपणाचा फायदा घेत दामिनी आणि घरातील काही सदस्य त्याला सावीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. धैर्यची साथ नसताना सावी या अन्यायाविरोधात कशी उभी राहणार? ती स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. पण या कठीण काळात सावी एकटी नाही. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहण्यासाठी पंचकन्या सज्ज झाल्या आहेत.
संगीतकार S P Venkatesh यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन; इंडस्ट्रीत पसरली शोककळा
इन्स्पेक्टर मंजू सुरुवातीपासूनच सावीच्या मदतीसाठी पुढे सरसावते. कायद्याच्या कचाट्यातून तिला बाहेर काढण्यासाठी राणी सावीच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. आता या लढ्यात अर्पिता, अनुप्रिया आणि वैदही यांचीही ताकद सावीला मिळणार आहे. राणी मनू, अर्पिता, अनुप्रिया आणि वैदही या पंचकन्या एकत्र येऊन सावीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी झुंज देणार आहेत. मात्र हा न्यायाचा लढा सोपा नसेल. सत्य बाहेर आणताना पंचकन्यांना अनेक अडचणी, कटकारस्थानं आणि आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे.