(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मालिका विश्वातील प्रसिद्ध चॅनल स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. नेहमीप्रमाणेच नव्या ट्विस्ट्स आणि रंजक कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत असून आता कथेत आणखी एक मोठं वळण पाहायला मिळणार आहे.
अनुपमा ही व्यक्तिरेखा सुरुवातीपासूनच तिच्या आयुष्यातील अनेक संकटांना सामोरे जात स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करताना दिसली आहे. प्रत्येक अडचणीतून उभं राहत पुढे जाण्याची तिची जिद्द हीच या मालिकेची खासियत ठरली आहे. आता कथानकात लीपनंतर अनुपमा एका नव्या शहरात गोव्यात नव्यानं आयुष्य सुरू करताना दिसणार आहे.
किंग खानही पडेल फिका; ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पुरुष कलाकरांनी तरुणींना लावले वेड, Dance असावा तर असा
या नव्या टप्प्याबद्दल बोलताना अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी सांगितले की, “लीपनंतर अनुपमाच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. ती आता पूर्णपणे नव्या वातावरणात स्वतःला सावरत आहे. जगणं आणि पुढे जाणं हेच तिच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती हॉटेलमध्ये काम करण्यापासून ते साफसफाईपर्यंत कोणतंही काम करण्यास मागे हटत नाही. इतकं सगळं सहन करूनही ती आशा सोडत नाही, हेच तिच्या व्यक्तिरेखेचं बळ आहे.”
पुढे त्या म्हणाल्या, “प्रेक्षकांना अनुपमाच्या संघर्षाची, तिच्या एकटेपणाची आणि तिच्या शांत ताकदीची झलक या टप्प्यात पाहायला मिळेल. ‘अनु की रसोई’सारख्या उपक्रमातून स्वतःची ओळख निर्माण करणारी अनुपमा आता गोव्यात कॅफे सुरू करण्याच्या स्वप्नातून पुन्हा एकदा नव्या उद्देशाच्या शोधात आहे.” या भूमिकेबद्दल बोलताना रुपाली म्हणाल्या की, “एक कलाकार म्हणून अनुपमाच्या या नाजूक पण आशावादी प्रवासाला साकार करणं माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेक्षकांनी तिच्या या प्रवासात साथ द्यावी, हीच अपेक्षा आहे.” असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे.
‘सालबर्डी’तील ‘मंजुळा’ गाण्यात सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाज; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?
दरम्यान, गोव्यात नव्याने आयुष्य उभारताना अनुपमा तिच्या संघर्षांवर कशी मात करणार, तिचं कॅफे सुरू करण्याचं स्वप्न पूर्ण होणार का? आणि तिच्या आयुष्यात आणखी कोणते ट्विस्ट येणार? याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. ‘अनुपमा’चा हा नवा अध्याय प्रेक्षकांसाठी अधिक भावनिक, प्रेरणादायी आणि रंजक ठरणार आहे.






