
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
झी मराठी नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. झी मराठीवर येत्या एप्रिल महिन्यापासून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘दीपज्योती’. ही गोष्ट आहे प्रेमाने आपलूलकीने बांधलेल्या बहीण भावांच्या नात्याची ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भावाची. ज्योतीच्या परिवाराची कहाणी अशी कि ज्योतीचे वडील दारू प्यायचे, दारूतच त्यांनी स्वतःच्या आयष्याचं मातरें करून घेतलं आणि संपूर्ण जबाबदारी ज्योतीच्या मोठ्या भावावर म्हणजे अभिजीत वर येऊन पडली. लहान वयातच त्याला शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. या घरामध्ये पैसे हातात खेळत नसला तरी सद्धा आनंदाचं वातावरण आहे. ज्योतीला शिकून चांगली नोकरी करण्याची इच्छा आहे.
एका बाजूला आहे ज्योतीचं कुटुंब—प्रेम, आपुलकी आणि संघर्षाने बांधलेलं. तर दुसरीकडे आहे एक घरंदाज आणि श्रीमंत कुटुंब, ज्याचे प्रमुख आहेत पुरुषोत्तम. त्यांच्या कुटुंबात तीन मुलं—स्वराज, दीप आणि विराज—आणि त्यांच्यासोबत आत्या आहे.
स्वराज हा पुरुषोत्तम यांची कार्बन कॉपी मानला जातो. वडिलांनी शून्यातून उभा केलेला व्यवसाय पुढे नेण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे. विराज स्वतःच्या नोकरीत समाधानी आहे. मात्र, दीपचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या वळणावर आहे.
Ek Din मधील ‘ख्वाब देखूं’ गाणं रिलीज; जुनैद खान आणि साई पल्लवीच्या गोड जोडीने पाडली भुरळ
लहानपणी आईच्या मृत्यूनंतर पुरुषोत्तम यांना वाटतं की दीपच त्यासाठी जबाबदार आहे. त्यामुळे ते त्याचा तिरस्कार करतात. आईच्या जाण्याने तुटलेला दीपही हळूहळू दारूच्या आहारी जातो आणि वडील-मुलाच्या नात्यात दरी वाढत जाते.मालिकेची गोष्ट एका धक्कादायक घटनेपासून सुरू होते, जिथे एका क्षणात आनंदावर दुःखाचं सावट येतं.यानंतर दीप आणि ज्योती यांची भेट कशी होते, त्यांच्या नात्याचा प्रवास कसा सुरू होतो आणि प्रेमाच्या ज्योतीने तुटलेली मनं पुन्हा जुळतील का—हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत रोचक ठरणार आहे.
मालिकेत दीप आणि ज्योतीच्या प्रमुख भूमिकेत प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या जोडीची केमिस्ट्री या मालिकेचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे.तसंच, ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका या मालिकेत पाहायला मिळणार आहेत, ज्यामुळे कथेला अधिक वजन मिळणार आहे.‘दीपज्योती’ मालिकेचं लेखन अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी यांनी केलं असून, संवाद लेखन इरफान मुजावर यांचं आहे. मालिकेचं दिग्दर्शन अमित सावर्डेकर यांनी केलं आहे.‘दीपज्योती’ ही मालिका सूड आणि प्रेम यांच्या संघर्षातून नात्यांची खरी किंमत दाखवणारी ठरणार आहे.