
'मी जिंकून घेईन सारं' मध्ये नक्की काय घडणार
लग्न निर्विघ्नपणे पार पडणार का ? अनिकेत – छवी काय उघड करण्याचा प्रयत्न करणार ? शांभवी त्याला कशी सामोरे जाणार ? आणि असं काय घडणार कि ज्यामुळे छवीला शांभवीची माफी मागावी लागणार आहे ? घरात पाऊल ठेवताच शांभवीने छवीला अडचणीत टाकायला सुरुवात केली आहे हे दिसून येत आहे. पण, घराबाहेर असलेल्या वादळाचा सामना घरात आल्यावर छवी कसा करणार? छवी शांभवीपासून राजगुरू परिवाराचे कसं रक्षण करणार ? कसे शांभवीचे खरे रूप घरासमोर आणणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आता मालिका पहावीच लागणार आहे.
छवी आणि ‘बाई-आजी’च्या अतूट नात्याची कथा; ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेची चाहत्यांना उत्सुकता
घडणार नाट्य
लग्नाच्या तयारीदरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसणार आहेत. शांभवीचा अचानक राजीनामा देणे आणि साकेतला प्रेमासाठी लढायला मिळालेलं motivation, आणि बाईआजींकडून पुन्हा लग्नाचे प्रोपोसल येणं या सगळ्यामुळे वातावरण तापतं. छवी सतत शांभवीवर संशय घेताना दिसणार आहे, कुंडली तपासण्याचा प्रयत्न करते, पण घरात कोणीच तिच्यावर विश्वास ठेवत नाही. याचदरम्यान राजनाथ शांभवीचा पाठलाग करताना दिसतो, आणि तिच्या आयुष्यात काहीतरी मोठं गूढ दडलं असल्याचे संकेत मिळतात. छवी आणि वात्सलामधील भावनिक संघर्ष टोकाला जातो, इतकं की वात्सला तिला “आजपासून मी तुझी आई नाही” असं म्हणते आणि छवी पूर्णपणे कोसळते.
नक्की काय घडणार?
सगळंच उलथापालथ होतं. छवी आणि अनिकेत दोघं मिळून लग्नमंडपात पोहोचून हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र बाईआजी ठामपणे सांगतात हे लग्न होणारच! बाईआजी असं का म्हणतात ? इतकंच नाही, तर छवीलाच शांभवीची माफी मागायला लावली जाते. आता प्रश्न उरतो शांभवीचं खरं सत्य कधी उघड होणार? आणि छवी या सगळ्या भावनिक आणि मानसिक संघर्षातून कशी बाहेर पडणार?
Colors marathi serial:‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवं वळण, शिवाचं सत्य दूर करेल का जगदंबेचा गैरसमज?