
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Veen Doghantali Hi Tutena Promo: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत दिवसेंदिवस नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. समर आणि स्वानंदीच्या आयुष्यातील संकटं कमी होत नाहीत, अशातच आता नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. नुकतीच वटपोर्णिमेच्या दिवशी समर- स्वानंदीने एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नव्हे तर स्वानंदीने राजवाडेंना ‘आय लव्हू यू सुद्धा म्हणाली आहे. या दोघांचे प्रेम बहरतंय हे पाहून सगळ्यात जास्त आनंद आजीला झालेला आहेय वटपोर्णिमेच्या मुहूर्तावर आजी या दोघांनाही सुखाने संसार करा असा आशीर्वाद देला आहे.
पण आता झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमो मधून अस दिसत आहे की, समर – स्वानंदीच्या नात्याला नजर लागेल. त्याच्या सुखी संसारात अडथळे निर्माण करण्यासाठी मल्लिका आणि अंशुमन हे दोघंही कटकारस्थानं रचताना दिसतील.
प्रोमोमध्ये मल्लिका आपल्या मुलाला म्हणते, “काहीही करून समर-स्वानंदीमधलं अंतर वाढलं पाहिजे.” या संवादावरून ती दोघांमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांना वेगळं करण्याचा कट रचत असल्याचं स्पष्ट होतं.
दरम्यान, समर आणि स्वानंदी एकत्र रोमँटिक गप्पांमध्ये रमलेले असतात. मात्र, त्याच वेळी मल्लिका अचानक डोकेदुखीचं नाटक सुरू करते. तिचा आवाज ऐकून समर आणि स्वानंदी दोघेही तिच्याकडे धाव घेतात आणि नेमकं काय झालं आहे, याची विचारपूस करतात.
यावेळी मल्लिका म्हणते, “समर, माझं डोकं खूप दुखतंय… मला वाटतंय माझ्या डोक्यात गाठ आली आहे.” तिची अवस्था पाहून समर तिला तातडीने डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतो.
स्वानंदीसमोर उभा राहून अंशुमन म्हणतो, “तुम्हाला आम्ही कसं डिस्टर्ब केलं पाहिलंस ना… आता सहा महिन्यांत तुम्हाला वेगळं करून दाखवतो.” त्याच्या या वक्तव्यामुळे स्वानंदी आणि समरच्या नात्यावर पुन्हा एकदा संकटाचे ढग दाटल्याचे दिसत आहे.
अंशुमनचं हे उघड आव्हान ऐकल्यानंतर स्वानंदी त्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार आणि समरसोबतचं आपलं नातं टिकवण्यासाठी कोणती पावलं उचलणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.
आता अंशुमनचा डाव यशस्वी होणार की स्वानंदी त्याच्या प्रत्येक खेळीला पुरून उरणार, हे आगामी भागांमध्ये स्पष्ट होईल. समर-स्वानंदीच्या नात्याची ही नवी परीक्षा मालिकेत कोणतं वळण आणते, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.