भारतीयांवर दु:खाचा डोंगर; अहमदाबाद विमान अपघातातील १०० मृतदेह बाहेर काढले, आकडा वाढण्याची शक्यता
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत मृतांचा आकडा समोर आला आहे. आतापर्यंत १०० मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. अद्याप बरेच प्रवासी विमानाखाली अडकले असून एनडीआरएफकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. विमानात मोठा स्फोट झाल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडन गॅटविक विमानतळावर जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळलं. त्यात दोन पायलट आणि १० केबिन क्रू सदस्यांसह २४२ प्रवासी होते. विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक प्रवास करत होते.
The tragedy in Ahmedabad has stunned and saddened us. It is heartbreaking beyond words. In this sad hour, my thoughts are with everyone affected by it. Have been in touch with Ministers and authorities who are working to assist those affected.
— Narendra Modi (@narendramodi) June 12, 2025
अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आले आहे. विमानाला उड्डाणासाठी परवानगी मिळाल्यानंतर सुमारे नऊ मिनिटांनी हा अपघात झाला. घटनास्थळी प्रचंड धुरामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Ahemdabad Plane Crash : टेकऑफ की लँडिंग… कधी असतो विमान क्रॅश होण्याचा सर्वाधिक धोका? वाचा सविस्तर
एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अहमदाबाद-लंडन गॅटविकला जाणारं विमान एआय १७१ चा आज अपघात झाला. सध्या, आम्ही तपशील तपासत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स शेअर करू. अधिक माहिती देण्यासाठी एअर इंडियाने १८०० ५६९१ ४४४ हा प्रवाशांसाठी हॉटलाइन क्रमांक देखील सुरू केला आहे.
The Ahmedabad Air India crash is heartbreaking.
The pain and anxiety the families of the passengers and crew must be feeling is unimaginable. My thoughts are with each one of them in this incredibly difficult moment.
Urgent rescue and relief efforts by the administration are…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 12, 2025
अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाचा अपघात अत्यंत वेदनादायक आहे. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ज्या वेदना होत असतील आणि चिंता वाटत असेल ती अकल्पनीय आहेत. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या प्रत्येकासोबत आहेत. प्रशासनाकडून तातडीने बचाव आणि मदतकार्य करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांही सर्व ती मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.