
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड; शुभेंदू कॅबिनेटमध्ये 35 मंत्र्यांचा समावेश
गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रचंड विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीचा अंत झाला. ९ मे रोजी सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्याच दिवशी दिलीप घोष, निशिथ प्रमाणिक, अग्निमित्र पॉल, अशोक कीर्तनिया आणि के. टुडू या पाच मंत्र्यांनीही शपथ घेतली होती. आजच्या विस्तारामुळे सुवेंदू मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ४१ झाली आहे. तसेच गौरी शंकर आणि अजय पोद्दार हे देखील मंत्री झाले आहेत. यावेळी लोक भवनात आणखी पस्तीस मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, नवीन मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही. शपथ घेतलेल्यांमध्ये भाजपचे आमदार दीपक बर्मन, स्वप्न दासगुप्ता, तापस रॉय, शंकर घोष, मनोज कुमार ओरम, अर्जुन सिंह आणि गौरी शंकर घोष यांचा समावेश होता.
National News: देशातील आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; भाजप खासदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट
तसेच स्वपन दासगुप्ता, अर्जुन सिंह, दीपक बर्मन, तापस रॉय, जगन्नाथ चॅटर्जी, मनोज कुमार ओरम, गौरी शंकर घोष आणि अजय पोद्दार, या सर्वांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा, ज्वेल मुर्मू, हरिकृष्ण बेरा, शांतनु प्रमाणिक, उमेश रॉय, पूर्णिमा चक्रवर्ती, भास्कर भट्टाचार्य, कलिता माजी, बिराज बिस्वास, आनंदमय बर्मन, विशाल लामा आणि दिपांकर जाना यांची राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. मालती रावा राय, राजेश महातो आणि इंद्रनील खान यांची स्वतंत्र कार्यभारासह राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
#WATCH | Kolkata, West Bengal: BJP MLAs Deepak Barman, Arjun Singh, Shankar Ghosh, Gauri Shankar Ghosh, Tapas Roy and Manoj Kumar Oraon take oath as Cabinet Ministers in CM Suvendu Adhikari’s led state government (Source: PWD IT Dept) pic.twitter.com/477S6Agycr — ANI (@ANI) June 1, 2026
आतापर्यंत पाच विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. दिलीप घोष यांची पंचायत आणि ग्रामीण विकास, पशुसंवर्धन विकास आणि कृषी विपणन मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. अग्निमित्रा पॉल यांची महिला आणि बालकल्याण आणि शहरी व ग्रामीण विकास मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निशित प्रमाणिक यांच्याकडे उत्तर बंगाल विकास आणि क्रीडा विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. अशोक कीर्तनिया यांच्याकडे अन्न विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. खुदीराम टुडू यांची मागासवर्गीय कल्याण आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.