Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cabinet Meeting : सामान्यांना दिलासा मिळणार? रेल्वेपासून ते शेतकऱ्यांपर्यंत…, मंत्रिमंडळाने घेतले हे ३ मोठे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीतून सर्वसामान्यांना थोडासा का होईना दिसाला मिळाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 10, 2025 | 01:23 PM
सामान्यांना दिलासा मिळणार? रेल्वेपासून ते शेतकऱ्यांपर्यंत..., मंत्रिमंडळाने घेतले हे ३ मोठे निर्णय (फोटो सौजन्य-X)

सामान्यांना दिलासा मिळणार? रेल्वेपासून ते शेतकऱ्यांपर्यंत..., मंत्रिमंडळाने घेतले हे ३ मोठे निर्णय (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ९ एप्रिल २०२५ रोजी मंत्रिमंडळ आणि आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समिती (CCEA) ची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. कृषी सिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. सरकारने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये रेल्वे प्रकल्प आणि पंजाब आणि हरियाणा दरम्यान रस्ते प्रकल्पालाही मान्यता दिली आहे.

बुधवार, ९ मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले. ज्यामुळे सामान्य जनतेसह शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्था आधुनिक करण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याशिवाय रेल्वे प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना दिलासा मिळेल.

भारताच्या भूमी अन् लोकांवर हल्ला केला त्याला…; तहव्वुर हुसैनला आणण्यापूर्वी अमित शाहांचे महत्त्वपूर्ण विधान

कृषी सिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. सरकारने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये रेल्वे प्रकल्प आणि पंजाब आणि हरियाणा दरम्यान रस्ते प्रकल्पालाही मान्यता दिली आहे. या प्रकल्पांमुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारतामधील वाहतूक सुधारेल आणि इतर प्रकल्पांमुळे दिल्ली आणि पंजाबमधील वाहतूक सुधारेल.

रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये तिरुपती-पकला-काटापडी एकल रेल्वे मार्गाच्या (१०४ किमी) दुपदरीकरणाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १,३३२ कोटी रुपये खर्च येईल. याअंतर्गत, रेल्वे नेटवर्कमध्ये सुमारे ११३ किमीची वाढ होईल. प्रवासी आणि मालगाड्यांच्या वाहतुकीत सुधारणा होईल. या निर्णयाचा फायदा तीन जिल्ह्यांतील सुमारे ४०० गावे आणि १४ लाखांहून अधिक लोकांना होईल. यामुळे जवळपासच्या अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना आणि पर्यटन स्थळांना रेल्वे जोडणी सुधारेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय, कोळसा, सिमेंट, कृषी उत्पादने आणि खनिजांच्या वाहतुकीची क्षमता दरवर्षी ४० लाख टनांनी वाढेल.

रस्त्याच्या प्रकल्पालाही मंजुरी

त्याच वेळी आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने झिरकपूर बायपासच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. हा सहा-लेन बायपास राष्ट्रीय महामार्ग-७ (झिरकपूर-पटियाला) पासून राष्ट्रीय महामार्ग-५ (झिरकपूर-परवाणू) पर्यंत सुरू होईल, ज्याची एकूण लांबी १९.२ किमी असेल. हा प्रकल्प पंजाब आणि हरियाणा राज्यात १८७८.३१ कोटी रुपये खर्चून हायब्रिड अॅन्युइटी मोड अंतर्गत बांधला जाईल.

कृषी सिंचन योजनेला मान्यता

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट (M-CADWM) च्या आधुनिकीकरण योजनेला २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या उप-योजनेसाठी सुरुवातीला १६०० कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश सिंचन पाणीपुरवठा नेटवर्कचे आधुनिकीकरण करणे आहे, जेणेकरून कालवे किंवा इतर स्रोतांमधून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी सहज पोहोचवता येईल.

Air India Pee: भारतीयाकडून जपानी व्यक्तीवर लघुशंका, पुन्हा एकदा एअर इंडियातील विकृत प्रकार समोर

Web Title: Cabinet meeting cabinet approves three big project including agriculture sinchai yojana and rail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 01:23 PM

Topics:  

  • Cabinet Meeting
  • narendra modi

संबंधित बातम्या

PM Kisan योजनेतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले..; यादीत तुमचे नाव असे चेक करा ?
1

PM Kisan योजनेतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले..; यादीत तुमचे नाव असे चेक करा ?

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण
2

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?
3

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?
4

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.