Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdas Athawale: ‘कोण काय करत आहे, हे…”; जातिनिहाय जनगणनेवर रामदास आठवलेंचे मोठे विधान

मोदी सरकारने जातिनिहाय जनगणनेचा घेतलेला हा निर्णय बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधीच मोठा निर्णय समजला जात आहे. 1947 नंतर देशात जातिनिहाय जनगणना करण्यात आलेली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: May 01, 2025 | 07:15 PM
Ramdas Athawale: ‘कोण काय करत आहे, हे…”; जातिनिहाय जनगणनेवर रामदास आठवलेंचे मोठे विधान
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: आज केंद्र सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानबाबत काही मोठा निर्णय होतो का याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र आज झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने सर्वात मोठी घोषणा केली आहे. देशभरात जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयावर भाष्य केले. रामदास आठवले म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. हा निर्णय ऐतिहासिक असा निर्णय आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरात शेड्यूल जनगणना होत होती. आता पहिल्यांदाच ओबीसी जनगणना होणार आहे.”

“कॉँग्रेसने अशा प्रकारची कधीही जनगणना केली नाहीये. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी जातीच्या आधारावर जनगणना करू असा निर्णय घेणार असं सांगितलं होतं पण ते केलं नाही. राहुल गांधी आधीपासून ओबीसी जनगणना झाली पाहिजे अशी मागणी करत होते. मी सुद्धा जातीच्या आधारावर जनगणना करा ही मागणी अनेकदा लोकसभेत केली होती”, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

“ओबीसी बरोबर सर्व जातींची जनगणना होणे आवश्यक आहे. किती लोकं शेतकरी आहेत, कोण काय करत आहे, हे सर्व जनगणनेमध्ये आलं पाहिजे. अत्यंत चांगला निर्णय असा मोदी सरकारने घेतला आहे. याचे श्रेय कोणीही घ्यायची गरज नाही. हे सर्व श्रेय मोदी सरकारचे आहे. विरोधकांनी याचं क्रेडिट घेऊ नये. जातिनिहाय जनगणना केल्यामुळे ओबीसी किती आहेत, लिंगायत किती आहेत, प्रत्येक जातीमध्ये कोण किती आहे हे कळणार आहे”, असे आठवले म्हणाले.

देशात जातिनिहाय जनगणना करणार

भारतात दहा वर्षांनी जातिनिहाय जनगणना केली जाते. त्यानुसार 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. मात्र त्यावेळेस करोना संसर्ग असल्याने जातिनिहाय जनगणना करण्यात आली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जातीच्या गणणेचा जातिनिहाय जनगणणेत समावेश केला जाईल असे अश्विनी वैष्णव म्हणाले.

Big Breaking: देशात जातिनिहाय जनगणना करणार; नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय

मोदी सरकारने जातिनिहाय जनगणनेचा घेतलेला हा निर्णय बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधीच मोठा निर्णय समजला जात आहे. 1947 नंतर देशात जातिनिहाय जनगणना करण्यात आलेली नाही. कॉँग्रेसने जातिनिहाय जगणणेऐवजी जातिनिहाय सर्वेक्षण केले, अशी टीका मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॉँग्रेसवर केली आहे. आजच्या केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा निनरया होईल अशी शक्यता होती. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत पहलगाम हल्ल्याबाबत काहीतरी निर्णय होईल असे वाटत होते. मात्र केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Web Title: Central minister ramdas athawale statement on modi government caste census decision marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 07:15 PM

Topics:  

  • Caste Census
  • PM Narendra Modi
  • Ramdas Athawale

संबंधित बातम्या

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ
1

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज
2

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख
3

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी
4

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.