छत्तीसगड नक्सली क्षेत्रामध्ये 30 नक्षलवादी ठार करण्यात जवानांना यश आले आहे.
छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा यंत्रणा मोठ यश मिळालं आहे. नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा अभियान सुरु आहे. यामध्ये नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर शुक्रवारी सुरक्षा दलाला मोठे यश आले. सीमेवर चकमकीमध्ये सुरक्षा यंत्रणांनी शौर्य दाखवत 30 नक्षलवादींचा खात्मा केला आहे. घटनास्थळावर 600 जवान तैनात करण्यात आले असून या ठिकाणी जवानांना मोठ्या प्रमाणात ऑटोमॅटिक शस्त्रे सापडली आहेत .
छत्तीसगडमधील नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात अबूझमाड येथे नक्षलवाद्यांसोबतची चकमक येथे झाली. हा परिसर सीमाभागात येत असून या क्षेत्रात नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर सुरक्षादलाच्या संयुक्त पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केले. दुपारी एकच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. उत्तरादाखल सुरक्षा जवानांनी कारवाई केली. यामध्ये नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांकडे AK 47 देखील असल्याचे समोर आले आहे.
Chhattisgarh: 30 naxals killed so far in the encounter with Police in Maad area on Narayanpur-Dantewada border. A huge amount of automatic weapons recovered. Search operation is underway. Further details awaited. pic.twitter.com/3tweIUd6YX
— ANI (@ANI) October 4, 2024
हे देखील वाचा : महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा! आज पंतप्रधान मोदी मुंबईत तर राहुल गांधी कोल्हापूरात
या चकमकीनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दंतेवाडा बॉर्डरवर नक्षलवाद्यांची कुमूक आल्याबाबत सुरक्षा यंत्रणांना खबऱ्यांकडून टिप ऑफ मिळाला होता. अंधार झाल्यानंतर गोळीबार थांबवण्यात आला होता. पण दोन्ही बाजूंनी सुरक्षा यंत्रणां पोझिशन घेऊनच थांबल्या आहेत. याठिकाणी जवळपास 600 पेक्षा जास्त जवान तैनात असून आहेत. याठिकाणी 3 नक्षली कंपन्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे, सुरक्षा जवान व नक्षल्यांमध्ये पहाटेपर्यंत चकमक सुरुच राहिल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.